HW News Marathi
देश / विदेश

भाजप सरकारच्या काळात नोक -यात ६० टक्क्यांनी घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदी सरकारला तीन वषार्पेक्षा अधिक काळ पूर्ण झाला आहे. यादरम्यान नव्या नोक-यात तब्बल ६० टक्क्यांनी घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी नोक-या निर्माण करण्याचा दावा केला होता. नोक-यांची संख्या वाढविण्यासाठी मोदी सरकारने लेबर आणि स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीने मोठे बदल केले होते. तरीही दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचा दावा फोल ठरला. त्याचबरोबर अर्थव्यवस्थाही सुस्त पडलेली आहे. त्यामुळे मोदींनी अरुण जेटलींना यासाठी लवकरात लवकर पाऊल उचण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

र्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकार आता ठोस पावले उचलत आहे. त्याशिवाय लवकरच स्टिम्युलस पॅकेजवर लवकरच निर्णय होऊ शकतो. नोटबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मंद झाल्याचा दावा तज्ञ्जांनी केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार आर्थिक वृद्धीचा दर सहा टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. भाजप सरकारच्या काळात नोक-यांमध्येही मोठ्या प्रमाणात सातत्याने घट झाल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणूकींत काँग्रेस बेरोजगारी या मुद्यावर सरकारला वेठीस आणू शकते. त्याचे संकेत खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वीच दिले आहेत. गांधी म्हणाले होते की, मोदी सरकार नोक-या देण्यात असक्षम ठरत आहे. दररोज ३० हजार तरुण नोक-यांच्या शोधात येत आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ४५० जणांना नोकरी मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोना लसीबाबत सोनिया गाांधींची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे ‘ही’ मागणी

News Desk

विरोध पक्षांकडून भारतीय सैन्याचा वारंवार अपमान केला जात आहे !

News Desk

घरगुती गॅस सिलिंडच्या किंमती आजपासून वाढ

News Desk
क्राइम

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk

ठाणे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसोबत त्याच्या बहिणीचा दीर इकबाल पारकर, मोहम्मद हुसैन ख्वाजा शेख (ड्रग डीलर), फर्नांडो असे आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

इक्बाल कासकर त्याच्या बहिणीच्या घरी कौन बनगे करोडपती बघत बिर्याणी खात असताना अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर खंडणी रॅकेट चालवत होता. दाऊदच्या खंडणी टोळीत थेट राजकारण्यांची नावं असल्याची शंका परमवीर सिंह यांनी व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related posts

टिप्पर आणि मिनी बसमध्ये भिषण अपघात , तीन जणांचा मृत्यू

News Desk

पुण्यात भरदिवसा गोळीबार, विद्यापीठ चौक परिसरातील घटना

News Desk

व्यापाऱ्याच्या मुलीची प्रियकराकडून हत्या

News Desk