HW News Marathi
देश / विदेश

भाजप सरकारच्या काळात नोक -यात ६० टक्क्यांनी घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदी सरकारला तीन वषार्पेक्षा अधिक काळ पूर्ण झाला आहे. यादरम्यान नव्या नोक-यात तब्बल ६० टक्क्यांनी घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी नोक-या निर्माण करण्याचा दावा केला होता. नोक-यांची संख्या वाढविण्यासाठी मोदी सरकारने लेबर आणि स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीने मोठे बदल केले होते. तरीही दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचा दावा फोल ठरला. त्याचबरोबर अर्थव्यवस्थाही सुस्त पडलेली आहे. त्यामुळे मोदींनी अरुण जेटलींना यासाठी लवकरात लवकर पाऊल उचण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

र्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकार आता ठोस पावले उचलत आहे. त्याशिवाय लवकरच स्टिम्युलस पॅकेजवर लवकरच निर्णय होऊ शकतो. नोटबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मंद झाल्याचा दावा तज्ञ्जांनी केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार आर्थिक वृद्धीचा दर सहा टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. भाजप सरकारच्या काळात नोक-यांमध्येही मोठ्या प्रमाणात सातत्याने घट झाल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणूकींत काँग्रेस बेरोजगारी या मुद्यावर सरकारला वेठीस आणू शकते. त्याचे संकेत खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वीच दिले आहेत. गांधी म्हणाले होते की, मोदी सरकार नोक-या देण्यात असक्षम ठरत आहे. दररोज ३० हजार तरुण नोक-यांच्या शोधात येत आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ४५० जणांना नोकरी मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी! मागितलं ‘हे’ बक्षीस

News Desk

#CoronaVirus | ‘कोरोना’विरोधी लढाईत बीसीसीआय करणार ५१ कोटींची मदत

News Desk

शिवसेनेचा ‘परळ ब्रॅंड’ मोहन रावल यांचे निधन

News Desk