HW News Marathi
देश / विदेश

नेपाळमध्ये भूकंपाचे तीन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

काठमांडू | नेपाळमध्ये एका मागोमाग सलग भूकंपाचे तीन धक्के बसल्याने संपूर्ण देश हादरला आहे. नेपाळमध्ये आज (२४ एप्रिल) सकाळी सव्‍वा सहा वाजण्‍याच्या सुमारास काठमांडू येथे ४.८ रिश्‍टर स्‍केल पहिला भूकंपाचा धक्‍का बसला. दुसरा धक्का ६.२९ वाजता ५.२ रिश्‍टर स्‍केल आणि ४.३ रिश्‍टर स्‍केल भूकंपाचा तिसरा धक्का ६ वाजून ४० मिनिटांनी नोंदवण्यात आला. परंतु या भूपंकाच्या धक्क्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र देशातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्णाण झाले आहे.

देशात या दुर्घटनेत ८ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर २२,००० लाेक जखमी झाले हाेते. काठमांडूमध्ये सकाळी झालेल्या दुर्घटनेत कोणताही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर उशीरा रात्री भारतातदेखील भूकंपाचे धक्के जाणवले. भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या उत्तर-पूर्व राज्यात १ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली. यापूर्वी एप्रिल २०१५ ला नेपाळमध्ये ८.२ या तीव्रतेने भूकंप झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारकडून मुंबई लोकलसाठी तब्बल ५४ हजार कोटींचा निधी मंजूर

News Desk

देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान! – राष्ट्रपती

Aprna

आलोक वर्मा यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

News Desk