HW News Marathi
देश / विदेश

सत्तेत असताना माझाही फोन टॅप झाला ही दुर्दैवाची गोष्ट !

नवी दिल्ली | माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आले तर महाराष्ट्राला अधिक उपयोग होईल असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मारला. इतक्यावरच न थांबता फडणवीस सरकारच्या काळात अनेक नेत्यांचे फोन टॅप झाले असा आरोप होता त्यावर नाराजी व्यक्त करत माझा फोन टॅप झाला असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विरोधी पक्षाच्या काळात फोन टॅप होतो हे ऐकले होते पण सत्तेत असतानाच माझा फोन टॅप करण्याची गरज का भासली असा प्रश्नही एकनाथ खडसेंनी य मुलाखती दरम्यान उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे. या पार्श्वभूमीवरही खडसेंनी प्रतिक्रिया दिली.

दिल्लीच्या निवडणूका जवळ आल्यासून महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते अनेक दिवसांपासून दिल्लीत प्रचारासाठी तळ ठोकून होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्याकाही दिवसांपासून दिल्लीत होते काल (५ फेब्रुवारी) निवडणूकीच्या जबाबदारीतून मुक्त होत त्यांनी महाराष्ट्रात येण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. दिल्लीत येणं किंवा न येणं हे फडणवीसांच्या मर्जीवर नाही, नेत्यांनी ठरवले तर काही निर्णय होऊ शकतो असेही वक्तव्य खडसेंनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गलवान खोऱ्यातील प्रत्येक जवान सशस्त्र होता, पण…!, परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण  

News Desk

पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

News Desk

Republic Day | स्टार्ट-अप इंडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रोत्साहन

News Desk