HW News Marathi
देश / विदेश

सामान्यांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा फटका

पणजी | दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दरम्यान, गोव्यातील लोकांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा फटका बसणार आहे. एफपीपीसीएमुळे वीज दरांत वाढ होणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ही दरवाढ लागू करण्यात आली असल्याने नागरिकांना ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये याची वीजदरवाढीची झळ बसणार आहे.एफपीपीसीएमुळे(फ्युअल अ‍ॅण्ड पॉवर परचेज कॉस्ट एडजस्टमेंट) ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी वीजदर वाढले आहेत.

घरगुती वापरासाठी लागणाऱ्या विजेचा ४०० युनिटपेक्षा अधिक वापर झाल्यास प्रती युनिट १८ पैसे दरवाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. घरगुती वापराच्या विजेसाठी आता ० ते १०० युनिटकरीता प्रति युनिट ७.३९ पैसे, १०१ ते २०० युनिटकरिता ९.९० पैसे, २०१ ते ३०० युनिटकरिता १२.८० पैसे, ३०१ ते ४०० युनिटकरिता प्रति युनिट १५.९७ पैसे तर ४०० पेक्षा जास्त युनिटकरिता प्रती युनिट १८.०८ पैसे एवढी वाढ करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुगलमुळे हत्येच्या कटातून सुटका

News Desk

#AyodhyaRamMandir : असे दिसणार अयोध्येचे भव्य राम मंदिर ! दिमाखदार रचना

News Desk

अर्थव्यवस्थेची स्थिती आणि बेरोजगारी, सुप्रिया सुळेंनी मांडले अधिवेशनात महत्वाचे मुद्दे 

News Desk
मुंबई

मुंबईतील डंपिंग ग्राऊंड आता अंबरनाथमध्ये हलवणार

News Desk

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मुंबईचा कच-याचा मोठा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या डंपिंग ग्राऊंडसाठी अंबरनाथमधील जागा देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. अंबरनाथमधील ‘करवले’ गावातील ३० एकर जागा देण्याचे राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे.

अंबरनाथमधल्या ३० एकरांच्या जागेवर मुंबईतील नवे डम्पिंग ग्राऊंड तयार होणार आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने करवले गावातील ३० एकरची जागा पुढील ३ महिन्यांत बीएमसीच्या ताब्यात देण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले आहेत. तसेच देवनारमधील डंपिंग ग्राऊंड कधी बंद करणार, असा सवाल देखील न्यायालयानं मुंबई महापालिकेला विचारला आहे.

Related posts

आता छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

News Desk

कोरोना काळात तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलं ? मनसेचा राऊतांना सवाल

News Desk

रेल्वे अंगावरून जाऊनही जिवंत | सीसीटिव्हीत कैद

News Desk