HW News Marathi
देश / विदेश

कृषी कायदा रद्द होणार नाही अमित शाहांनी केले स्पष्ट, तर आजची होणारी बैठकही रद्द

नवी दिल्ली | गेले अनेक दिवस शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठकही कुठल्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हनन मुला यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. कृषी कायद्यातील सुधारणांबाबत केंद्र सरकार आज आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना लिखित प्रस्ताव देणार आहेत. या प्रस्तावावर शेतकरी विचार करणार आहेत. दरम्यान, बुधवारी केंद्र सरकारसोबत होणारी बैठक होणार नसल्याचेही मुला यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे. त्यांनी १३ शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली. इंडियन कॉन्सिल ऑफ अँग्रिकल्चर रिसर्चच्या अतिथिगृहात ही बैठक झाली. अडीच तास चाललेल्या बैठकीत कुठलाही समाधानकारक तोडगा निघाला नाही. शहा यांनी शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाला कायद्यात योग्य ते बदल करण्याबाबत लेखी देण्याबाबत आश्वासन दिले आहे. परंतू, शेतकरी नेते तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. कायद्यात बदल करण्याचा शहा यांचा प्रस्तावही शेतकरी नेत्यांनी फेटाळला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १३ शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली. इंडियन कॉन्सिल ऑफ अँग्रिकल्चर रिसर्चच्या अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस राकेश टिकैत, गुरनाम चढूनी, हनन मुल्ला, शिवकुमार कक्का, बलबीर सिंग, जगजीत सिंग दल्लेवाल, रुलदू सिंग मानसा, मंजित सिंग राय, बुटासिंग बुर्जगिल, हरिंदरसिंग लखोवाल, दर्शन पाल, कुलवंत सिंग संधू, बोध सिंग मानसा आदी १३ नेते सहभागी झाले होते. साधारणपणे अडीच तासाहून अधिक काळ ही बैठक चालली. शहा यांनी गेल्या १२ दिवसांत प्रथमच आंदोलकांशी थेट संवाद साधला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर

News Desk

भारतात मोमो चॅलेंजचा दुसरा बळी

Gauri Tilekar

“राज्यसभा निवडणुकीत ‘मविआ’चे सर्व उमेदवार विजयी होतील,” नाना पटोलेंचा विश्वास

Aprna