HW News Marathi
देश / विदेश

गलवान खोऱ्यातील प्रत्येक जवान सशस्त्र होता, पण…!, परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण  

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमासंघर्ष चिघळायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. यात भारताचे तब्बल २० जवान शहीद झाले. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्राला काही सवाल उपस्थित केले. “चीनच्या सैनिकांसमोर भारतीय जवानांना निशस्त्र कोणी आणि का पाठविले ? त्यासाठी जबाबदार कोण ?”, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी राहुल गांधींना याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. “गलवान खोऱ्यातील भारताचा एकही जवान निशस्र नव्हता. मात्र, करारानुसार त्या सीमाभागात हत्यारांचा वापर करता येत नाही,” असे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

“आपल्याला सत्यस्थिती काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. सीमारेषेवर कर्तव्य बजावत असलेला प्रत्येक जवान सशस्त्रच असतो. सीमारेषेवर आपली चौकी सोडत असताना सर्व जवान सशस्त्र असतात. गलवान खोऱ्यात १५ जून रोजी तैनात असलेल्या भारतीय जवान देखील सशस्त्रच होते. मात्र करणानुसार, या सीमाभागात हत्यारांचा वापर न करण्याबाबतचा स्पष्ट आदेश आहे. या विशिष्ट सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावावेळी शस्त्रांचा वापर न करण्याचा हा नियम भारत आणि चिनी सैन्य दीर्घकाळापासून पाळत आले आहे. १९९६ आणि २००५ सालच्या करारांनुसार हा नियम पाळला जातो आहे. त्यामुळे, भारतीय जवानांकडे शस्त्र नव्हती असे म्हणता येऊ शकत नाही. तर या सीमाभागात मुळातच शस्त्रांचा वापर केला जाऊ शकत नाही”, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हरियाणात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक | आठवले

News Desk

नवउद्योजकांच्या निर्मितीवरच त्यामुळे ‘घाव’ बसेल असे होऊ नये !

News Desk

“भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या सन्मानासाठी संसदेत कायदा पारित करा”, – अलाहाबाद न्यायालय

News Desk