HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक, काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर 

मुंबई | राज्यात महाविकासआघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली अंतर्गत धुसफूस आता उघड आहे. दरम्यान, महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मंत्री-नेत्यांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरच आज (१८ जून) काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “महाविकासआघाडी सरकार अगदी भक्कम आहे. पुढची ५ वर्ष आम्ही चांगले काम करू. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची कोणतीही नाराजी नव्हती”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. त्यामुळे, महाविकासआघाडीतील ताण काहीसा कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

“आमची कोणतीही नाराजी नव्हती. मात्र, काही मुद्द्यावर समोरासमोर चर्चा होणे आवश्यक होते. मुख्यमंत्र्यांसोबतची आजची चर्चा सकारात्मक झाली. यात कोणताही वैयक्तिक मुद्दा नव्हता. ही चर्चा केवळ प्रशासकीय विषयांवर होती”, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान मिळत नाही. शिवसेना, राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळते, अशा प्रकारची नाराजी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर “आमची कोणतीही नाराजी नव्हती”, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबईत आधार कार्डसाठी मध्यरात्रीपासून रांगा

swarit

“जळगावात महापौर निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश हे तात्कालिक”, भाजपची प्रतिक्रिया

News Desk

यास्मिन वानखेडेंचा नवाब मलिकांवर गंभीर आरोप,”ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच मलिक आरोप करतात”

News Desk