HW News Marathi
देश / विदेश

हार्दिक पंड्यांचे आक्षेपार्ह ट्विटबाबत स्पष्टीकरण

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज हार्दिक पंड्या यांच्या विरोधात जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती-जमाती कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कोणत्याही आक्षेपार्ह ट्विट केले नाही, असे स्पष्टीकरण हार्दिक पंड्या यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिले आहे.

जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती-जमाती कोर्टात गुरुवारी या याचिकेवर सुनावणी दरम्यान हार्दिक पंड्याविरोधात एफ. आय. आर. दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर हार्दिक पंड्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे.

  • हार्दिक पंड्याचे स्पष्टीकरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विटकरुन मी त्यांचा आपमान केल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडीयावर पसरल्या आहेत. पण, ‘मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट किंवा इतर कोणत्याही सोशल मीडीयावर आक्षेपार्ह वक्तव्य मी केले नाही. हे ट्विट बनावट अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात असे आक्षेपार्ह ट्विट केले आहे.’ मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो. देशातील सर्व जाती, जमाती आणि धर्माचा मी आदर करतो. लोकांच्या भावना दुखावल्या जाती असे आक्षेपार्ह ट्विट मी कधीच करणार नाही.

  • हार्दिक पंड्याचे ट्विट

हार्दिक पंड्या यांनी २६ डिसेंबर २०१७ रोजी पंड्याने ट्विटवरुन ‘कोण आंबेडकर?’ असे ट्विट पंड्याने त्यांच्या अकाऊंटवरुन केले होते. या ट्विटमुळे दलित समाजाच्या भावाना दुखवल्या’ असा आरोप डी. आर मेघवाल यांनी आरोप केला आहे. या ट्विट विरोधात डी. आर मेघवाल यांनी हार्दिक पंड्याविरोधात याचिका दाखल केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदी सरकार हे ईस्ट इंडिया कंपनीसारखं वागत आहे – महेश तपासे

News Desk

‘भाजप चले जाव म्हणायची वेळ आली’, नाना पटोलेंचा केंद्रावर हल्ला

News Desk

देशाच्या प्रत्येकाचा आम्हाला अभिमान-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

News Desk
देश / विदेश

सरकारने आंदोलनाच्या बस आणि रेल्वे गाड्या रोखल्या | अण्णा हजारे

News Desk

नवी दिल्ली | आंदोलनासाठी देशभरातून येणाऱ्या रेल्वे आणि बस रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी मोदी सरकरावर केला. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जनलोकपालची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. रामलीला मैदानात आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी माध्यमांशी

बोलताना सांगितले.

हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या द्वारे आंदोलन न करण्याची विनंती केली होती. पण, अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी आश्वास देऊन ही त्यांनी ते न केल्यामुळे मोदी सरकार विरोधात आंदोलन करत आहेत.

या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. हे आंदोलन सुरु होण्याआधी अण्णा हजारे राजघाटा येथे जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केले. रामलीला मैदानावर आंदोलनावर पोहचले आहेत. काँग्रेसने अण्णाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राळेगणसिद्धी गावातील ग्रामदैवत यादवबाबा मंदिर, निळोबाराय, पद्मावती या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर दिल्लीसाठी रवाना झाले होते.

Related posts

खड्ड्यामुळे दरदिवशी सहा जणांचा बळी

News Desk

शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले – सामना

News Desk

लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर मात्र जेलमधून बाहेर येऊ शकणार नाहीत कारण…

News Desk