HW News Marathi
देश / विदेश

सरकारने आंदोलनाच्या बस आणि रेल्वे गाड्या रोखल्या | अण्णा हजारे

नवी दिल्ली | आंदोलनासाठी देशभरातून येणाऱ्या रेल्वे आणि बस रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी मोदी सरकरावर केला. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जनलोकपालची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. रामलीला मैदानात आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी माध्यमांशी

बोलताना सांगितले.

हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या द्वारे आंदोलन न करण्याची विनंती केली होती. पण, अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी आश्वास देऊन ही त्यांनी ते न केल्यामुळे मोदी सरकार विरोधात आंदोलन करत आहेत.

या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. हे आंदोलन सुरु होण्याआधी अण्णा हजारे राजघाटा येथे जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केले. रामलीला मैदानावर आंदोलनावर पोहचले आहेत. काँग्रेसने अण्णाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राळेगणसिद्धी गावातील ग्रामदैवत यादवबाबा मंदिर, निळोबाराय, पद्मावती या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर दिल्लीसाठी रवाना झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्ला, ६ ठिकाणी झाला गोळीबार

News Desk

कॉंग्रेसच्या मानसिकतेवर टीका करत मोदींनी लोकसभेत सांगितला एक किस्सा

News Desk

वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी जगभरातील दिग्गजांची उपस्थिती

News Desk