HW News Marathi
देश / विदेश

प्रजासत्ताकदिनानंतर आता अर्थसंकल्पादिवशी १ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार! संसदेवर काढणार मोर्चा

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत काल (२६ जानेवारी) प्रजासत्ताकदिनी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये प्रचंड धुमश्चक्री पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कूच केली होती. शेतकरी पोलीस झटापटीत ३०० पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. तर दिल्ली पोलिसांकडून १५ एफआयर दाखल करण्यात आल्या आहेत. सिंघू बॉर्डर आणि लाल किल्ल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकरी कालच्या प्रकारावर न थांबता देशाच्या अर्थसंकल्पादिवशी पुन्हा एल्गार करणार आहेत. शेतकऱ्यांचा १ फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. नवी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारमध्ये ३०० पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांकडून पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे. क्राईम ब्रँचकडे हिंसाचाराचा तपास सोपवला जाण्याची शक्यता आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिराच्या भूमिपूजनादिवशी ओविसी यांचे ट्विट, “बाबरी मशिद होती आणि राहील”

News Desk

कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर ४ मान्यवर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Aprna

अखेर दिल्ली पोलिसांकडून शाहिनबाग रिकामे, सर्व आंदोलकांना हटविले

News Desk