HW News Marathi
देश / विदेश

निवडणूक आयोग हा दात नसलेला वाघ 

भाजप नेते वरूण गांधींची टिका

दिल्ली – निवडणूक आयोग हा दात नसलेला वाघ आहे, अशी टीका भाजप खासदार वरूण गांधी यांनी केली. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे भाजपलाच घरचा आहेर म्हणावे लागेल. निवडणूक आयोगाने नुकतीच हिमाचल प्रदेशच्या निवडणूका जाहीर केल्या. मात्र गुजरातची निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. आयोगाच्या या कृती मुळेच वरूण यांनी ही टिका केल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. दरम्यायान शुक्रवारी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था असल्याचे सांगितले होते. त्यानंतर वरूण यांनी केलेले वक्तव्य अनेक गोष्ठींचे संकेत देत आहे.

निवडणूक आयोगाचे निवडणूका घेणे आणि त्यावर पूर्ण पणे नियंत्रित करणे हे आहे. पण असे खरोखर सध्या होत आहे का असा प्रश्नही त्यांनी केला. निवडणूक आयोगाकडे मर्यादीत शक्ती आहे. निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीतल्या गैरप्रकाराची माहिती मिळाल्यास त्याची तक्रार नोंदवण्याआधी निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते, असे वरुण गांधी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज जाहीर होणार टीम इंडियाचा कोच

News Desk

डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात लष्कर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान घुसले

News Desk

संभाजीराजे राज्यसभा निवडणूक लढणार की माघार घेणार?, उद्या घेणार पत्रकार परिषद

Aprna