HW News Marathi
देश / विदेश

धुक्यामुळे हरयाणामध्ये भीषण अपघात

नवी दिल्ली | हरयाणामध्ये शनिवारी सकाळी दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हरयाणातील अंबाला-चंदीगड मार्गावर शनिवारी सकाळी हा अपघात झाला आहे. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चंदीगडवरून येणाऱ्या दोन कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे.

या पुर्वी देखील हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला होता. रोहतक-रेवारी हायवेवर सोमवारी झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआय प्रकरणी ट्विट केल्यामुळे प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

News Desk

संजय राऊत दिल्लीत, भाजप नेत्यांची भेट घेणार?

News Desk

“आपण पुन्हा लग्न करुयात आणि सत्तांतर करुयात..”, मोदी-ठाकरे भेटीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया

News Desk