HW News Marathi
देश / विदेश

अखेर मोदी सरकारने जिंकला विश्वास

नवी दिल्ली | भाजप सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदा अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. या अविश्वास ठराकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. भाजपाकडे बहुमत असून देखील मतदान भाजपाचे सदस्य भाजपाला मतदान करणार नाहीत असे देखील बोलले जात होते. परंतु शुक्रवारी दिवसभरात सर्व पक्षांची मते जाणून घेतल्यानंतर उशीरा मतदान घेण्यात आले. त्यावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने केवळ १२६ मते, तर मोदी सरकारच्या बाजूने ३२५ मते पडल्यामुळे या अविश्वास प्रस्तावात मोदी सरकारने विश्वास जिंकल्याचे चित्र पहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात तेलगू देसम आणि काँग्रेसने हा अविश्वास ठराव मांडला होता. मोदी सरकारकडे लोकसभेत आवश्यक संख्याबळ असल्याने हा अविश्वास प्रस्ताव पारित होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या ठरावादरम्यान काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा लोकसभेत मांडला. या सर्व घडामोडींनंतर झालेल्या मतदानात भाजपाच्या पारड्यात ३२५ मते पडल्यामुळे मोदी सरकारचा विजय झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छोटा राजनसह चौघांना सात वर्षांचा कारावास

News Desk

बाळासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र घडवणं, संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारणं हीच खरी आदरांजली !

News Desk

पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही !

News Desk