HW News Marathi
देश / विदेश

अर्थ मंत्रालयातील १२ उच्चपदस्थ आयकर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात देखील झाली आहे. मोदी सरकारने अर्थ मंत्रालयातील १२ उच्चपदस्थ आयकर अधिकाऱ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सरकारने आयकर अधिकाऱ्यांमध्ये चीफ कमिश्नर, प्रिन्सिपल कमिश्नर आणि कमिश्नर पातळीच्या अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास भाग पाडले असल्याची माहिती मिळाली आहे.

या सर्व अधिकाऱ्यांना डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड अडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्सच्या नियम ५६ अंतर्गत कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती ‘द हिंदू’ या वृत्त पत्राच्या रिपोर्टमध्ये दिली आहे. अर्थ मंत्रालय या १२ अधिकाऱ्यांच्या कामवर नाखूष होते. यापैकी काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्ता, तसंच लैंगिक शोषणाचे आरोपही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मोदी सरकारने घरी पाठवलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अशोक अग्रवाल, एसके श्रीवास्तव, होमी राजवंश, बीबी राजेंद्र प्रसाद, अजॉय कुमार सिंह, बी अरुलप्पा, आलोक कुमार मित्रा, चांदर सेन भारती, अंडासू रवींद्र, विवेक बत्रा, स्वेताभ सुमन आणि राम कुमार भार्गव यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? कॉंग्रेसच्या या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणतात…

News Desk

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी सुशांतसिंह प्रकरणाचा वापर !

News Desk

मनसुख मांडवीया यांनी केली राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम 2022 ची सुरवात

News Desk