HW News Marathi
Covid-19

रामदेव बाबा यांच्या पतंजलीचे औषध कोरोनावर किती प्रभावी ?, जाणून घ्या… डॉ. अविनाश भोंडवे काय म्हणतात

मुंबई | योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना व्हायरसवर आज पहिले आयुर्वेदिक औषध लॉन्च केले आहे. या औषधामुळे १०० टक्के रुग्ण बरे होतात आणि ० टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथे औषधाचे आज (२३ जून) उद्धाटन केले. रामदेव बाबाच्या औषधाचे नाव कोरोनील श्वासारीचे असे आहे. या पार्श्वभूमीवर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे रामदेव बाबा यांच्या औषधावर काही प्रश्न उपस्थित केले असून रामदेव बाबा यांचे कोरोनील आणि श्वासारी हे औषध कोरोनावर किती ट प्रभावी असेल, याबद्दल त्यांनी सांगतिले आहे.

रामदेव बाबा यांनी कोरोनावर काही गुणकारी औषध आहे, असा दावा त्यांनी केला आहे. गुळवैध आणि इतर औषध यांचा सामवेश असले कोरोनील आणि श्वासारी नावाची औषध त्यांनी आणली. रामदेव बाबांनी १०० जणांवर यांची चाचणी करून ३-७ दिवसांत कोरोना बरा होतो, अशा प्रकारचा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. यावर भोंडवे म्हणतात, कोरोनाची महासाथ संपूर्ण जगात पसरली आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी अनेक संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक परंपरागत औषध. नवी शोधलेली औषध किंवा इतर आधारात वापरली जाणारी औषध असतील. त्या औषधांना पुढे आण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आणि त्यासाठी अनेक ठिकाणी शोध सुरू आहे. जेव्हा एखादे नवी औषध बाजारात येत असते. किंवा सामन्य लोकांच्या वापरासाठी खुले होत असते. नवीन औषधाचे क्लिनिकल ट्रायल केले जाते आणि यांचे काही टप्पे आहे, असे त्यांनी सांगितले

क्लिनिकल ट्रायलचे असे आहेत टप्पे

औषध प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूवर किंवा त्या आजाराच्या विषाणूवर लागू पडतय का?, ते विषाणू नष्ट होतात का ?, हे प्रयोगशाळेत तपासले जाते, याला इन विट्रो तपासणी म्हणतात. या तपासणीत औषध जर जीवाणू नष्ट करत असतील. तर ते प्राथमिक प्राण्यावर म्हणजे उंदीर आणि ससा यांच्यावर वापरतात. हे औषध यांच्यावर यशस्वी झाल्यानंतर माकडांसारख्या प्राण्यामध्ये ते वापरले जाते. या सर्व गोष्टींवर औषधाचा चांगला परिणाम दिसतो. यानंतर मानवांवर औषध वापरण्यास परवागी दिली जाते.

जेव्हा एखाद्या औषधाची क्लिनिल ट्रायल घेतली जाते. तेव्हा ८-१० जणांमध्ये यांचा काही परिणाम पाहिला जातो. दुसऱ्या टप्प्यात तो काही हजार लोकांमध्ये तो तपासला जातो. त्यामध्ये औषधाचा डोस किती ठेवायचा, यात काही दुष्परिणा येतात का? याबद्दल तपासणी केली जाते. तिसऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या रंग, वंश, खंड, स्त्री, पुरूष आणि वेगवेळ्या वयोगतील लोकांवर यांचा प्रयोग केले जाता. या औषधाने त्या रुग्णांवर त्यांच्या आजारावर होणार परिणाम पॉझिटिव्ह दिसला तरच ते औषध बाजारात आणले जाते. या टप्प्यात औषध यशस्वी झाले तर ते आजारावर वापरण्यात येते.

औषधाची सत्यता तपासून पाहावी

रामदेव बाबा यांनी फक्त १०० रुग्णांची तपासणी केली. त्या रुग्णांची विविधता माहित नाही. कदाचित ही रामदेव बाबा यांच्या क्लिनिल ट्रायल पहिली पातळी असावी. त्यांनी प्राण्यावर प्रयोग केले नसावेत. कारण कोणताही वाईट परिणाम होत नाही, असे त्यांचे मत असावे. त्यामुळे त्यांनी १०० लोकांन प्रमाणे तर लोकांनाही हे औषध लागू परडले, असे त्यांना वाटते. जागतिक पद्धतीने जे औषध मान्य करायचे असते. त्यासाठी प्रदिर्घ संसोधन त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक त्यानंतर हे औषध खरोखरच लागू आहे, असे आपण म्हणून शकतो. रामदेव बाबांचा दावा हा प्राथमिक दावा असेल, याचे सत्यता तपासून पाहावे. योग्य असे तर या औषधाच्या पुढील चाचण्या घ्याव्यात आणि यात यशस्वी असेल तर ते वापरावे, असे मत आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे व्यक्त केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी आज उद्धव ठाकरे यांच्यासह १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना स्थितीवर करणार चर्चा

News Desk

अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार

News Desk

विरोधकांना कामधंदा नाहीय, जुनी गोष्ट उकरून काढतायत ! अजित पवारांची टीका

News Desk