HW News Marathi
देश / विदेश

सीमेवर भारतही करतंय गोळीबार : फारुख अब्दुल्ला

भारत- पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला असतानाच जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि ‘नॅशनल कॉन्फरन्स’ पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘सीमेवर फक्त पाकिस्तानच गोळीबार करतंय का?, आपणही गोळीबार करतो. शस्त्रसंधीचे उल्लंघन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून होतंय, असे फारुख अब्दुल्लांनी म्हटले आहे.

भारत- पाकिस्तानमधील तणाव वाढला असून सीमेवर पाकच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सीमेलगतच्या शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. पाकच्या गोळीबारात चार जवानही शहीद झाले आहेत. जम्मू- काश्मीर विधानसभेतही पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. मात्र नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी याबाबत वादग्रस्त विधान करुन आगीत तेल ओतण्याचेच काम केले.

ते म्हणाले, शस्त्रसंधीचे उल्लंघन फक्त पाकिस्तानच करतोय असं नाही. तर गोळीबार भारताकडूनही सुरु आहे. यामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पण युद्ध हा वादावरील तोडगा नाही. यावर फक्त चर्चेद्वारेच तोडगा काढता येईल, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्ला यांच्या विधानाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटण्याची चिन्हे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

IPS सुबोधकुमार जयस्वाल CBI चे नवे संचालक

News Desk

छत्तीसगढमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

News Desk

अदानी कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवले

News Desk
मुंबई

मराठी उद्योजकांनो स्वत:च्या व्यवसायाचे मार्केटिंग करा- आशिष पेठे

News Desk

मुंबई | लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स या संस्थेतर्फे नुकताच ३७ वा लक्ष्यसिद्धी सोहळा माटुंग्याच्या म्हैसूर असोशिएशन सभागृहात पार पडला. यासोहळ्यास वामन हरी पेठेचे भागीदार आशिष पेठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लक्ष्यवेध फाऊंडेशन आणि लक्ष्यवेध इंटरमिजिएट असे उद्योजकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना आशिष पेठे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे प्रमुख अतुल राजोळी, अतुल गोरे आणि विनय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

“१० वर्षे उद्योग केल्यानंतर सुद्धा तो उद्योग कोसळण्याची अनेक कारणे आहेत. पहिल्या १-२ वर्षांत जे उद्योग उभे राहिल्यानंतर कोसळतात त्यांना उत्पादनच मुळात कळलेलं नसतं. त्यामुळे ते उभे राहण्याच्या पूर्वीच कोसळतात. ४ ते ५ वर्षे कालावधीचा उद्योग कोसळतो कारण त्यांनी मार्केटींग स्ट्रॅटेजी नीट अवगत केलेली नसते वा त्याचा नीट वापर केलेला नसतो. त्याच्यापुढील जे उद्योगधंदे कोसळतात ते त्यांच्या मानसिकतेमुळे. आता आपण प्रस्थापित आहोत, आपल्याला मार्केटिंगची गरज नाही असे त्यांना वाटते आणि त्यांचा घात होतो. विपणन ही दीर्घकालीन आणि निरंतर प्रक्रिया आहे. ती तशीच चालू ठेवली पाहिजे. ऐन उमेदीच्या काळात तुम्ही व्यवसायात स्वत:ला झोकून द्या.

मात्र त्यानंतर व्यवसाय आणि कुटुंबाच्या वेळेत तुम्हांला समतोल साधता आला पाहिजे. व्यवसायात सतत संशोधन होणे आवश्यक आहे. जो व्यवसाय नाविन्याची कास धरुन स्वत:मध्ये बदल घडवितात ते स्पर्धेत टिकून राहतात”. अशा प्रकारचे उद्योजकीय बाळकडू आशिष पेठे यांनी उपस्थित उद्योजकांना दिले.”अतुल राजोळी ज्या प्रकारे मराठी उद्योजकांना घडवत आहेत ते खरोखरी वाखाणण्यासारखे आहे,” असे गौरवोदगार देखील त्यांनी यावेळी काढले.

Related posts

२९ तारीख मुंबईकरांसाठी घातक

News Desk

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तळमजल्यावर लागलेली आग आटोक्यात

News Desk

कुर्ल्याच्या भुयारी मार्गातून प्रवास करताय सावधान !

News Desk