HW News Marathi
देश / विदेश

ओडिसामध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

भुवनेश्वर | ओडिशातील मलकानगिरीतील कालीमेडा येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी(५ नोव्हेंबर) सकाळी चकमक झाली. यामध्ये जवानांना पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. घटनास्थळावरुन जवानांनी ५ हत्यारे आणि एक हँड ग्रेनेड जप्त केले आहे. दरम्यान, परिसरात अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आली. या चकमकीत नक्षलवाद्यांचा नेता रणदेबचाही खात्मा झाल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या आठवड्यात दंतेवाडामध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. दंतेवाडातील अरनपूर पोलीस ठाणे क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी बीजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीला रवाना

News Desk

वारीस पठाणांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल

swarit

मनमोहन सिंग यांच्या बंधूचा काँग्रेसला रामराम, ‘आप’मध्ये प्रवेश

News Desk