HW News Marathi
देश / विदेश

चारा घोटाळाप्रकरणी CBI विशेष न्यायालयाकडून लालू प्रसाद यादव दोषी

नवी दिल्ली | चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना सीबीआय विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. परंतु, न्यायालयाकडून थोड्याच वेळात लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावणार आहे. यामुळे लालू प्रसाद यादव यांना न्यायालय नेमकी कोणती शिक्षा सुनावली जाणार, यासर्व सर्वांचे लक्ष लागेल आहे. तसेच लालू प्रसाद यादव हे गेल्या तीन वर्षापासून शिक्षा भोगत आहे. 

या प्रकरणात २४ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणाचा २६ वर्षांनंतर हा निकाल लागणार आहे. आता न्यायालय चारा घोटाळा प्रकरणी १८ फेब्रुवारीला शिक्षा सुनावणार आहे. चारा घोटाळा प्रकरणी १७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील ५५ आरोपींचा मृत्यू झाला आणि ७ आरोपी हे आता साक्षीदार बनले आहेत. तसेच यातील २ आरोपींनी गुन्हा मान्य तर ६ आरोपी फरार आहे. या प्रकरणात एकूण ९९ आरोपींवर अद्याप निर्णय बाकी आहे. 

१९९६ साली बिहारमध्ये ९०० कोटींचा प्राण्यांचा चारा घोटाळा झाला होता. यानंतर २९ जून १९९७ मध्ये लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केले होते. या घोटाळ्या प्रकरणी १२ डिसेंबर १९९७ मध्ये लालू प्रसाद यादव यांना सुटका करण्यात आली यानंतर पुन्हा एकदा २०१२मध्ये सीबीआयकडून चारा घोटाळ्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यानंतर २०१३ साली त्यांना पुन्हा एकदा पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलमानला तुरुंगावास झाला तर जोधपूर तुरुंगात आसाराम बापू शेजारी

News Desk

पॉर्न वेड्या नवऱ्याविरोधात पत्नीची सुप्रीम कोर्टात तक्रार

News Desk

नववारी साडी नेसून पार केली 42 किलोमीटरची स्पर्धा

News Desk