HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तिवारी यांचे निधन

दिल्ली | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचे गुरुवारी दुपारच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नारायण दत्त तिवारी यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२५ ला झाला होता. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश राज्याचे २००७ पासून राज्यपाल होते. ते मार्च २००२ ते मार्च २००७ या काळात उत्तरांचलचे आणि जानेवारी १९७६ ते एप्रिल १९७७, ऑगस्ट १९८४ ते सप्टेबर १९८५ आणि जून १९८८ ते डिसेंबर १९८८ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अशाप्रकारे दोन राज्यांचे मुख्यमंत्रापद भुषविण्याचा मान त्यांना मिळाला.

१९८० च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. त्याचबरोबर जून १९८० ते जुलै १९८१ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.त्यानंतर ऑक्टोबर १९८० ते फेब्रुवारी १९८३ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, उद्योगमंत्री, अवजड उद्योगमंत्री आणि कायदामंत्री ही पदे भूषविली. तसेच जून १९८५ ते ऑक्टोबर १९८६ या काळात ते पेट्रोलियम मंत्री,ऑक्टोबर १९८६ ते जुलै १९८७ या काळात ते परराष्ट्रमंत्री आणि जुलै १९८७ ते जून १९८८ या काळात ते अर्थमंत्री होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ऐकलत का, आता २० रुपयाचे नाणे आले

News Desk

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, लवकरच कळेल मध्यस्ती होणार की नाही?

Atul Chavan

Republic Day | जाणून घ्या… भारतीय संविधानाचा इतिहास

News Desk
राजकारण

ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होणार !

News Desk

बीड | ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी यंदा सावरगाव येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळ्याला उपस्थित जनतेला संबोधित करताना ऊसतोड कामगार महामंडळांची घोषणा मुंडेंनी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्याचा दिवस मावळेपर्यंत ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होईल, हे वचन मी तुम्हाला देते, तुम्ही बघाच असे पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना म्हटले आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रवचन देणे हे माझे काम नाही तर माझ्या माध्यमातून लोकांचा विकास करणे हे माझे काम असल्याचे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. मला माझ्या माय माऊलीच्या डोक्यावरचा घडा खाली उतरवायचा आहे. उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते घरकुल योजनेअंतर्गत अडीच लाख घरे देण्यात येणार आहेत. सरकार कधीही सामान्य जनतेकडे पाठ फिरविणार नाही. असे म्हणत पंकजा मुंडेनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, मी काम करते तर तुमच्या पोटात का दुखते असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला. महाराष्ट्रात २०१९ ला भाजपचं विजयाची घंटा वाजविणार असा विश्वास यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

 

Related posts

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त शेअर बाजारासाठी नकारात्मक

News Desk

उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करुन घ्यावी !

News Desk

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला अन् इकडे भाजपचे सेलिब्रेशन सुरू

Aprna