HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेश अपघातप्रकरणी रेल्वेचे चार अधिकारी निलंबित

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात शनिवारी झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी रेल्वेने एका वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच अन्य तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मुजफ्फरनगरजवळच्या खतौली येथे उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळांवरून घसरून हा भयंकर अपघात झाला होता. त्यात 23 जण ठार तर तब्बल 150 जण जखमी झाले होते.
या भीषण अपघातानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. दरम्यान, सुरेश प्रभू यांनी याप्रकरणी एक समिती नेमली आणि जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा असेही आदेश प्रभू यांनी दिले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार -देवेंद्र फडणवींसाचा वाढदिवस एकत्र असला तरी राजकीय सूर एकत्र का नाहीत ?

News Desk

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील जुन्या तरतुदी कायम राहणार | केंद्र सरकार

swarit

पाकिस्तानमध्ये आजही जीवंत आहे भगतसिंग 

News Desk