HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेश अपघातप्रकरणी रेल्वेचे चार अधिकारी निलंबित

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात शनिवारी झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी रेल्वेने एका वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच अन्य तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मुजफ्फरनगरजवळच्या खतौली येथे उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळांवरून घसरून हा भयंकर अपघात झाला होता. त्यात 23 जण ठार तर तब्बल 150 जण जखमी झाले होते.
या भीषण अपघातानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. दरम्यान, सुरेश प्रभू यांनी याप्रकरणी एक समिती नेमली आणि जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा असेही आदेश प्रभू यांनी दिले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरएसएस आणणार कामसूत्र

News Desk

महात्मा गांधींबाबत हेगडेंचे वादग्रस्त वक्तव्य, देशातील राजकारण पेटण्यास सुरुवात

swarit

केंद्राचा मोठा निर्णय, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना १० टक्के आरक्षण

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Related posts

रामजन्मभूमीसंदर्भात झालेला जमीन घोटाळा हा श्रीमंतांचा अपराध ! शिवसेनेचा घणाघात

News Desk

राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती

News Desk

पोलिसच पुरवतात दहशतवाद्यांना शस्र

News Desk