HW News Marathi
देश / विदेश

#Lockdown : राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून टोलवसूलीला होणार सुरुवात

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या संकटाला आळा घालण्यासाठी १४ एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन हा ३ मेपर्यत वाढवण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. दरम्यान, काही उद्योग, व्यापार हे २० एप्रिलपासून सुरु करण्याच्या तयारीतही सरकार आहे. २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोलवसूली सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ही परवानगी दिली असून वाहतूक उद्योगाशी संबंधित वर्गाने या निर्णयाला विरोध केला आहे.

लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर २५ मार्चपासून टोलवसूली ही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. तसेच, गृह मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्गाला एक पत्र लिहिले होते. ज्यात, टोलवसूली देशाच्या आर्थिक तिजोरीला मजबुती देते. त्यामूळे २० एप्रिलपासून टोलवसूलीला सुरुवात झाल्यानंतर कोणत्याही वाहन चालकाने सरकारने दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जय जय पांडुरंग हरी ! पंतप्रधानांची विठ्ठल चरणी प्रार्थना

News Desk

पुन्हा दरवाढ ; पेट्रोल, डिझेल महागले

News Desk

नवाज शरीफ यांची सुटका, शिक्षेवर स्थगिती

News Desk