HW News Marathi
देश / विदेश

धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या

बंगळुरु | पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्रातून परशुराम वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. धर्माच्या रक्षणासाठी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुराम वाघमारे याने दिली असल्याचा दावा कर्नाटकच्याय एसआयटीने केला आहे.

५ सप्टेंबर २०१७ रोजी परशुराम यांनी लंकेश यांच्यावर चार गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली दिली आहे. लंकेश यांच्या हत्येसाठी तीन जणांची मदत घेण्यात आली असल्याचे देखील परशुरामने सांगितले. या तीन जणांचा शोध कर्नाटकची एसआयटी घेत आहे.

लंकेश यांची हत्या करण्यासाठी बेळगावात ट्रेनिंग घेऊन हत्या करण्यासाठी एअरगनचा वापर केला असल्याचे देखील परशुराने सांगितले. लंकेश यांच्या हत्या करण्यासाठी परशुरामला कुठल्या संघटनेने किंवा संस्थेने सांगितले होते? त्यांच्या हत्ये मागे कुणाचा हात आहे? याबाबत कर्नाटकच्या एसआयटीने अद्याप कोणतीच माहिती दिली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

९ हजार ७४६ बोगस मतदान ओळखपत्र जप्त

News Desk

काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ

News Desk

कोफी अन्नान यांचे निधन

News Desk
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील आमदारांचा वेतन, महागाई भत्ता जाणून घ्या

swarit

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणाऱ्या आमदार यांना किती पगार आहे. हे जाणून घेणयासाठी आपण सर्वजण उत्साहित आहोत. महाराष्ट्र सरकारने २०१८ या वर्षाच्या कालावधीत आमदारांवर किती पैसे खर्च केले आहेत. या सर्व खर्चाची माहिती ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्राजक्त झावरे-पाटील यांनी महाराष्ट्र विधानमंडळाकडून ही माहितीच्या अधिकारा अंतर्गत अर्ज करुन ही धक्कादायक माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्रातील आमदारांना एकूण पगार, मूळ पगार, महागाई भत्ता आणि इतर भत्ते यांची सर्व माहिती मिळवली आहे. महाराष्ट्रातील आमदारांना प्रत्येक महिन्यात ६७,००० रुपये हा त्यांचा मूळ पगार आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. परंतु महाराष्ट्रातील आमदारांना मात्र महागाई भत्ता ९१,१२० रुपये मिळतो. आता सर्व आमदारांकडे स्मार्टफोन असून देखील त्यांना जुन्या काळाप्रमाणे दूरध्वनीसाठी महाराष्ट्र सरकार ८,००० रुपये मिळत आहे.

२१व्या शतकात सर्वजण ई-मेलचा वापर करत असताना. परंतु इतिहास जमा झालेल्या टपाल सेवेसाठी सुद्ध सरकार दरमहिना १०,००० रुपये देते. संगणक चालकांच्या सेवेसाठी १०,००० रुपये मिळतात. तर महाराष्ट्रातील आमदारांना एकूण १,८६,१२० रुपये खर्च केले जातात. महागाई भत्ता, टपाल सेवा आणि दूरध्वनी यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या पैसांवर अनेक सवाल उपस्थित राहिले आहेत.

Related posts

मिलिंद एकबोटेला काळं फासण्याचा प्रयत्न

News Desk

कॉंग्रेसने ठणकावल्यानंतर सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार? भाजपचा सेनेला सवाल

News Desk

ठाकरे सरकारची नियतच खोटी, भाजपकडून वीज बिलाच्या रद्दीवरुन सरकारवर टीका 

News Desk