HW News Marathi
देश / विदेश

प्रेमात अडचण ठरल्याने प्रेयसीच्या मुलीची हत्या

नवी दिल्ली- प्रेमात अडचण निर्माण करणाऱ्या आपल्या प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्व दिल्लीमधील गाजीपूर येथे घडली आहे. आरोपी व्यक्तीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. जेव्हा त्याने आपल्या लग्नाचा प्रस्ताव महिलेसमोर ठेवला तेव्हा तिने उत्तर देण्याआधी काही अटी ठेवल्या होत्या. अटीनुसार तिच्या मुलीलाही स्वत:ची मुलगी म्हणून स्विकारले पाहिजे, तसेच तिच्या शिक्षणाचा खर्चही उचलला जावा. प्रेयसीला मिळवण्यासाठी आतूर झालेल्या आरोपीला ही अट मान्य नव्हती. मुलीचा बाप होण्यास तयार नसल्याने त्याने हत्येचा कट रचला. दोन सप्टेंबर रोजी चिमुरडी आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण घराबाहेर पडलेली ती पुन्हा परतलीच नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राकेश अस्थाना यांची चौकशी सुरूच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

News Desk

‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला अस्मिता आहे हे दिसलं असतं!

News Desk

…म्हणून २ हजारच्या नोटांची छपाई बंद

News Desk