HW News Marathi
देश / विदेश

कॉमनवेल्थ गेम्समधील महिला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक

सिडनी | २१व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावले आहे. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये ४८ किलो वजनीगटात ८६ किलो उचलत भारताला सुर्वण पदकाला गवसणी घातली आहे. मीराबाईने पहिल्या प्रयत्नात ८० किलो वजन उचलले. त्यानंतर ८४ आणि ८६ किलो वजन उचलून सुर्वण पदक मिळवले.

भारताचा गुरु राजा यांनी ५६ वजनीगटात २४९ किलोचे वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवले. तसेच मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांनी २६१ किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले. तर श्रीलंकेचा अशून चुतरंगा लकमल यांनी २४८ किलो वजन उचलत कास्य पदक मिळवले. भारताकडे महिला आणि पुरुष वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदक मिळवण्यात यश आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यातील आयुर्वेदीक डॉक्टर्सही घेणार ‘कोरोना’ उपचारासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण

News Desk

संपूर्ण देश सैनिकांच्या मागे उभा आहे – नरेंद्र मोदी 

News Desk

वाहतूक नियम तोडल्यास आपल्या बँक खात्यातून जमा होणार दंड

News Desk
महाराष्ट्र

शहीद मेजर कौस्तुभ राणे पंचतत्वात विलीन

swarit

मुंबई | काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना भारतीय लष्करातील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे हे शहीद झाले. शहीद मेजर कौस्तुभ यांच्यावर आज लष्करी इतमामात आज दुपारी बाराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाणेच्या मिरारोड येथील नागरिकांनी कौस्तुभ यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सोमवारी रात्री काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना चार जवानांना वीरमरण आले होते. यात मीरा रोडच्या शीतल नगर भागात राहणाऱ्या २९ वर्षांच्या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही समावेश आहे.

मेजर राणे यांच्या मातोश्री ज्योती, पत्नी कनिका, मुलगा अगस्त्य, बहिण कश्यपी यांनी स्मशानभूमीत अखेरची श्रध्दांजली वाहिली त्यावेळी भावनाविवश नागरिकांनी “भारतमाता की जय, माँ तुझे सलाम अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी लष्कराच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

Related posts

अखेर प्रीतम मुंडे नाराज समर्थकांच्या भेटीला

News Desk

मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला हे नाव घेऊन सांगतो – एकनाथ खडसे

News Desk

मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी वाहिली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईच्या स्मृतीस श्रद्धांजली

News Desk