HW News Marathi
देश / विदेश

गुगलमुळे हत्येच्या कटातून सुटका

कानपूर: एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास सध्या गुगलचा आधार घेण्यात येतो. याच गुगल एका युवकाच्या मदतीला धावून आला. गुगलमुळे आरोपी युवकाची हत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. भारतीय हवाई दलात अधिकाºयाचा मुलगा जय प्रताप सिंह याला एका ११ वर्षाच्या मुलाच्या हत्येच्या आरोपात मागील वर्षी अटक करण्यात आली होती. न्यायालयात सरकारी पक्षाच्या वकीलांनी दिलेले पुरावे आणि पोलिसांनी केलेले दावे यांच्यात विसंगती आढळून आल्या.

ज्या दिवशी रेहानची हत्या झाली, त्या दिवशी आपण अ‍ॅनिमेशन डिझाइनसंबंधी आॅनलाइन काम करत असल्याचा दावा जय प्रताप सिंहने केला होता. जयच्या पालकांनी गुगलमधून त्याची आॅनलाइन हिस्ट्री, लोकेशन, आॅनलाइन काम केले त्याची माहिती जमवली. या खटल्यात हे पुरावे जयसाठी मदतीस आले. गुगलने दिलेल्या अहवालानुसार, जयचा आयपी अ‍ॅड्रेस सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत वापरात होता. या दरम्यान त्याने अनेक वेबसाईट्सला भेट दिली होती. मात्र, पोलिसांच्या दाव्यानुसार रेहानची हत्या सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाली होती. या खटल्याचा निकालात सत्र न्यायालयाने जय प्रताप सिंहची निर्दोष मुक्तता केली. तर, या प्रकरणात तपास करणाºया अधिकाºयाविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज नॅशनल फूड डे, भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ कोणता ?

Gauri Tilekar

देशात कोरोनामुळे आतापर्यंत १६६ जणांचा बळी, तर ४७३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk

सीपीआय नेता कन्हैया कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk