HW News Marathi
देश / विदेश

सरकारने आंदोलनाच्या बस आणि रेल्वे गाड्या रोखल्या | अण्णा हजारे

नवी दिल्ली | आंदोलनासाठी देशभरातून येणाऱ्या रेल्वे आणि बस रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी मोदी सरकरावर केला. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जनलोकपालची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. रामलीला मैदानात आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी माध्यमांशी

बोलताना सांगितले.

हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या द्वारे आंदोलन न करण्याची विनंती केली होती. पण, अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी आश्वास देऊन ही त्यांनी ते न केल्यामुळे मोदी सरकार विरोधात आंदोलन करत आहेत.

या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. हे आंदोलन सुरु होण्याआधी अण्णा हजारे राजघाटा येथे जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केले. रामलीला मैदानावर आंदोलनावर पोहचले आहेत. काँग्रेसने अण्णाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राळेगणसिद्धी गावातील ग्रामदैवत यादवबाबा मंदिर, निळोबाराय, पद्मावती या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर दिल्लीसाठी रवाना झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ओबीसी आरक्षणाबाबतची सुप्रिम कोर्टातील आजची सुनावणी उद्यावर; भुजबळांनी दिली माहिती

News Desk

त्रिपुरा आणि नागालँड यादोन्ही राज्यात कांग्रेसचे डिपॉझिट जप्त

News Desk

इस्रोच्या G SAT-29 या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk