HW News Marathi
देश / विदेश

गुजरातमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हाणामारी

गुजरात | गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील छसरा गावात काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतिच्या निवडणूका पार पडल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी दोन गटात मोठा वाद झाला. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी असल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे. सुरुवातीला वादात सुरुवात झाली नंतर तो वाद हिंसात्मकतेत रूपांतरित झाले आहे.

छसरा गावातील ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत महिला उमेदवार सरपंचपदी निवडणून आल्या. त्यामुळे, पराभूत झालेल्या गटाचा विजयी गटासोबत वाद उफाळून आला शाब्दिक वादाला वेळ न लागता मारामारीत रूपांतर झाले. दोन्ही गटांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी झाली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमी झालेल्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच छसरा गावात पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले असून. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

श्रीनगरमध्ये जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, संतप्त जमावाकडून दगडफेक

News Desk

मोदी सरकारला मोठा धक्का ! कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची अंतरीम स्थगिती

News Desk

VLC Media Player भारतात बंदी, वेबसाइट आणि VLC डाउनलोड लिंक ब्लॉक

News Desk
राजकारण

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

News Desk

मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, तेव्हापासून आजपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले होते. भाजप सरकार आलं आणि चौथं वर्षही संपलं म्हणजे भाजप-सेना सरकारला या अपत्याला जन्माला घालायला ४ वर्षे लागली”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची आज निवड करण्यात आली आहे. त्यावेळी उपाध्यक्ष विजय औटी यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली आहे.

“विजय औटी हे उपाध्यक्ष झाले याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना पहिल्यांदाच हे पद दयायला हवे होते. त्यामुळे अधिक आनंद झाला असता. विजयराव औटी हे मी जेव्हा राजकारणातही नव्हतो तेव्हा समाजवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना मी ओळखतो. ते अरुण मेहता, सुरेश कलमाडी यांच्यासोबत ते काम करत होते”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

“विजयराव औटी यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. हे कुटुंबच समाजाशी जुळलेले आहे. औटी हे जुने समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली याचा आनंद आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी पक्षातर्फे विजय औटी यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ?

News Desk

दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी फटके मुख्यमंत्र्यांनाच का ?

News Desk

संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन

News Desk