HW News Marathi
देश / विदेश

गुजरातमध्ये बिहाऱ्यांना सुरक्षा द्या । नितीश कुमार

पटणा । ‘गुजरातमध्ये रोजगारासाठी आलेल्या बिहारी कामगारांच्या संरक्षणाची काळजी घ्या आणि त्यांच्यावर हल्ले थांबवा,’ अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना केले आहे. रुपाणी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही फोनवरून चर्चा केली आणि बिहार व उत्तर प्रदेशचे मजूर आता सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण

गुजरातच्या साबरकांठामध्ये एका बिहारी कामगाराने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे गुजरातमध्ये संतापाची लाट उसळली आगे. त्यामुळे स्थानिक लोकांनी सरसकट उत्तर भारतीय लोकांवर हल्ले सुरू केले आहेत. याप्रकरणी ४३१ हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीही या हल्ल्यांमुळे घाबरून सुमारे ५० हजार बिहारी व उत्तर प्रदेशातील कामगार गुजरातमधून आपापल्या गावी निघाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महिला पत्रकारांना पाठवू नका, हिंदू संघटनांचे माध्यमांना पत्र

swarit

उत्तर प्रदेशात ब्राम्हणांवर अत्याचार | मायावती

swarit

ट्रम्प-जोंग यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला

News Desk
राजकारण

अयोध्या वारीसाठी सेनेला मनसे शुभेच्छा !

News Desk

मुंबई | यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरुन भाषण करताना २५ नोव्हेंबरला अयोध्येत जावून मोदिंना राम मंदीर बांधणीबाबत प्रश्न विचारणार असल्याचे शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर मनसेने सेनाभवनासमोर आज पोस्टरबाजी केल्याचे पहायला मिळाले आहे. अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा, देत राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? असे पोस्टर शिवसेना भवनसमोर लावण्यात आले आहे.

मनसेने शिवसेनेला विचारलेले प्रश्न

महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का?

महागाई कमी होणार का?

महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का?

बेरोजगारांना रोजगार मिळणार का?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का?

शेती मालाला हमी भाव मिळणार का?

महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का?

मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?

महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का?

खिशातले राजीनामे बाहेर पडणार का?

Related posts

पालघरमध्ये भाजप बिनविरोधी जिंकण्यासाठी नवीन खेळी

News Desk

विधान परिषदेसाठी दराडेंना निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

News Desk

माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

News Desk