HW News Marathi
देश / विदेश

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, अनेक वस्तूंवरील जीएसटीत घट

मुंबई | जीएसटी कौन्सिलची बैठक शनिवारी (२२ डिसेंबर) पार पडली आहे. जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत आतापर्यंत ज्या उत्पादनांवर २८% जीएसटी लागू होता अशी ७ उत्पादने १८% जीएसटी लागू असणाऱ्या उत्पादनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त अन्य ४० उत्पादनांवरील जीएसटीच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. या ४० उत्पादनांमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयामुळे देशाच्या जनतेला दिलासा मिळाला आहे.

जीएसटी कौन्सिलची आज झालेली बैठक ही ३१ वी बैठक आहे. “दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या एकूण ४० उत्पादनांवरील जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आहे. यामध्ये १८% जीएसटी लागू करण्यात आलेल्या काही उत्पादनांचा समावेश १२% जीएसटी असणाऱ्या वस्तूंच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. तर १२% जीएसटी लागू असणाऱ्या काही उत्पादनांचा समावेश ५% जीएसटीच्या श्रेणीत करण्यात आला आहे”, अशी माहिती व्ही. नारायणसामी यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ट्विटरवर काँग्रेस आणि भाजपची ‘अ‍ॅप’ वॉर

News Desk

‘राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा’, नारायण राणे यांचं ठाकरेंवर टीकास्त्र

News Desk

कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला देणार नाही, येडियुरप्पांचा निर्धार

News Desk
राजकारण

राहुल गांधी आता पप्पू राहिले नसून गप्पू झाले आहेत !

News Desk

नवी दिल्ली | “राहुल गांधींनी हे आता पप्पू राहिलेले नाहीत. तर ते गप्पू झाले आहेत. राहुल गांधींचा पप्पूपासून गप्पूपर्यंतचा हा प्रवास खोटे बोलण्याच्या माध्यमातून सुरु झाला आहे”, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या पाच महत्त्वाच्या राज्यांपैकी विधानसभा निवडणुकांमध्ये तीन मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसने मिळविलेल्या दणदणीत विजयाचा भाजपला मोठा धक्का बसला आहे.

देशातील या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या काँग्रेसच्या विजयानंतर राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. राहुल गांधींच्या नेत्तृत्त्वाची जाहीरपणे प्रशंसा होऊ लागली. दरम्यान, मुख्तार अब्बास नक्वी यांनी याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींना टोमणा मारला आहे. राहुल गांधी हे पप्पू राहिले नसून ते आता गप्पू झाले आहेत. त्यांचा हा प्रवास खोटे बोलण्याचा माध्यमातून सुरु झाला आहे, अशी टीका मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली.

Related posts

अजित पवारांच्या बंगल्यावर ‘मविआ’ची बैठक सुरू; उद्धव ठाकरेंसह महत्वाचे नेते बैठकीला हजर

Aprna

राज्य सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा अंहकार

swarit

संभाजी भिंडेंच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीला सैनिकाने केला सॅल्यूट

News Desk