HW News Marathi
देश / विदेश

हरियाणात दाट धुक्यामुळे ५० गाड्यांचा अपघात

नवी दिल्ली | हरियाणामध्ये दाट धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी (२४ डिसेंबर) घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहतक-रेवारी हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे.

हायवेवर वेगाने येणाऱ्या दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर त्यामागे असलेली इतर वाहनेही एकमेकांवर आदळली. दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये शाळेच्या बसचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्रसिंग चुडासामा यांना गुजरात हायकोर्टाचा धक्का

News Desk

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २२ जानेवारीला फाशी

News Desk

#COVID19 : जाणून घ्या… देशातील कोणत्या राज्यात किती कोरोना रुग्ण ?

News Desk
क्राइम

शिवरायां’नी शोधून दिले स्त्रीलंपट आरोपी

News Desk

मुंबई : मायबहिणींच्या अब्रुचे रक्षण करण्याचे व्रत शिवछत्रपतींनी समाधीस्थ झाल्यानंतर तीन – साडेतीनशे वर्षांनंतरही अखंड सुरू ठेवले आहे. मुंबईत तरुणीची छेड काढून पळालेल्या रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्यात शिवछत्रपतींनी पोलिसांना सहकार्य केले आहे.

त्याचे झाले असे की, वांद्रे परिसरात राहणारी १७ वर्षीय तरुणी ज्ञानेश्वर नगर येथे रस्त्यातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या उमेश चव्हाण (२४) आणि सुनील राठोड (१९) यांनी भररस्त्यात तिचा छेड काढला. तरुणीने खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासले. आरोपी उभे असलेल्या ठिकाणी कुरिअर कंपनीचे ऑफिस असून कंपनीतील दोघांशी ते बोलत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. पोलिसांनी कुरिअर कंपनीतील आठ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, मात्र काहीच हाती लागले नाही. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोघांच्या दुचाकीवरील नंबरप्लेटशेजारी रेडियममध्ये शिवाजी महाराजांचे चित्र स्पष्ट दिसत होते. त्याआधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोहन कदम यांच्या पथकाने एका आरोपीला वांद्रेतून तर दुसऱ्याला वाकोल्यातून शिताफीने अटक केली. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी तब्बल ४० जणांची कसून चौकशी केली होती.

Related posts

माथेरानमध्ये पोलिसांकडूनच वाहन बंदीचे उल्लंघन, स्थानिकांकडून कारवाईची मागणी

News Desk

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून कृपाशंकर सिंह यांची सुटका

swarit

पोलिस ठाण्याच्या उद्घाटनानंतर पहिली तक्रार स्थानिक आमदारा विरोधातच

News Desk