HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे हेल्थ इमर्जन्सी लागू, ५ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद

नवी दिल्ली । प्रदूषणाची पातळी ओलांडल्यामुळे दिल्ली आणि परिसरात आरोग्य आणीबाणी म्हणजे हेल्थ इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. विषेश म्हणजे या प्रदूषणाचा परिणाम शालेय मुलांच्या आरोग्यावर होऊ नये. यासाठी दिल्लीतील सर्व शाळा ५ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने (ईपीसीए) प्रदूषण नियंत्रणासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील बांधकामांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
दरवर्षी दिल्लीमध्ये या कालावधीत प्रदूषणाचे प्रमाण उच्च असते. याला दिवाळीदरम्यान वाजवले जाणारे फटाके हे मोठे कारण आहे. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीतील हवा अत्यंत खराब आहे. याचा सर्वात जास्त त्रास शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना होतो. त्यामुळे सध्या खबरदारी म्हणून दिल्ली सरकारने ५ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आले आहे. तर नव्या बांधकामांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी त्यावरही बंदी असेल. तसेच दिल्ली सरकारने शालेय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, म्हणून मास्कचे वाटप देखील केले आहे.
ईपीसीएने दिल्लीसह, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सचिवांनाही पत्र पाठवून आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहे. दिल्लीच्या हवामान गुणांक ० ते ५० असेल तर हवेची गुणवत्ता चांगली समजली जाते. मात्र, सध्या दिल्लीतील सर्वच भागात ही पातळी तब्बल ४०० ते ५०० च्या घरात आहे. ४०० ते ५०० हा हवामान गुणांक सर्वात निकृष्ट दर्जाचा समजला जातो.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC आरक्षणासाठी भाजप आक्रमक ! राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात

News Desk

#PulwamaAttack : ‘कपिल शर्मा शो’मधून सिद्धू उचलबांगडी

News Desk

महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब पाठोपाठ दिल्लीही ‘लॉकडाऊन’ 

swarit