HW News Marathi
महाराष्ट्र

नवनिर्वाचित आमदारांना राष्ट्रपती राजवटीची धमकी, राऊतांचा भाजपवर आरोप

मुंबई | “नवनिर्वाचित आमदारांना राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे,” असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून आता ईडीच्या धमक्या दिल्या जाणं बंद झाल्या आहेत. आता ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देतात. नवनिर्वाचित आमदारांना सांगितले जात आहे की, लवकरात लवकर सत्तास्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, अशी धमकी दिली जात आहे. राऊत यांनी आज (२ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

“७ नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल,” असे सूचक विधान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर विविध चर्चांना उधाण आले आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेतून मुनगंटीवार यांचा खरपूस समचार घेतला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतरही मुख्यमंत्री आणि सत्तास्थापनेचा फॉर्म्युला यावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगुतीरा रंगला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यामुळे सध्या राज्या सरकार स्थापन होण्यास विलंब होणार असल्याचे चित्र दिसून येते आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

News Desk

“…हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही,” उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

Aprna

‘सुशासन’ अंमलबजावणीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेणार! – उपमुख्यमंत्री

Aprna