HW News Marathi
देश / विदेश

कठुआ बलात्कार व हत्या प्रकरणी आज सुनावणी

श्रीनगर | जम्मू कश्मीरच्या कठुआ येथे १० जानेवारी रोजी झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व अत्याचार प्रकरणी सोमवार १६ एप्रिल रोजी स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ८ ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या बलात्कार प्रकरणाची सुप्रिम कोर्टाने दखल घेतल्यानंतर पिडीतेचे वडीलांना धमकावण्यात येत असल्याचे बोलले जात होते.

पीडीतेच्या बाजूने बाजूने केस लढणा-या दीपिका सिंह राजावर यांना आरोपींच्या समर्थकांनी धमकावले होते. त्यामुळेच या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या राज्यात व्हावी अशी याचिका ते सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.या प्रकरणातील मारेक-यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये अनेक ठिकाणे आंदोलने सुरू आहेत. तर दुस-या बाजूला आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने सुरु आहेत. आरोपींवर बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारावर अनेक कलम लावण्यात आली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#CoronaVirus : आज मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन, पंतप्रधानांची घोषणा

swarit

संभाजीराजे आणि शरद पवारांमध्ये १५ मिनिटे चर्चा ! भेटीत नेमके काय घडले ?

News Desk

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान

News Desk
महाराष्ट्र

मोदी, फडणवीसांवर गुन्हा दाखल करावा

News Desk

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या केली. चायरे कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षानी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ‘कुटुंबियांच्या मागणी प्रमाणे चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या अगोदर सात महिन्यांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील टिटवी गावातील प्रकाश मानगावकर या शेतकऱ्यांने आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी मोदींचे नाव लिहून आपली जीवनयात्रा संपली होती. भाजपच्या काळात राज्यात १३ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन राज्यातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

गेले तीन दिवस चायरे कुटुंबियांनी शंकर चायरे यांचा मृतदेह ताब्यात घेतला गेला नाही. सरकारतर्फे किशोर तिवारी यांनी पाठवण्यात आले होते. पण गावक-यांनी त्यांना पिटाळून लावले. या आधीही प्रकाश मानगावकर यांच्या आत्महत्या प्रकरणात हेच किशोर तिवारी सरकारचे प्रतिनिधी म्हणून मानगावकर यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या पत्नीला नोकरी,मुलांचे शिक्षणासाठी मदत इत्यादी आश्वासने देऊन आले होते. मात्र त्यानंतर सरकारने ही शेतकरी आत्महत्या मानण्यासच नकार दिला.

गेल्या दोन दिवसात राज्य सरकारकडून किमान पालकमंत्र्यांनी तरी चायरे कुटुंबियांची भेट घ्यायला हवी होती. पण सरकारमध्ये ती संवेदनशीलता ही राहिली नाही. शेतक-यांच्या मृतदेहाच्या विटंबनेला सरकार जबाबदार आहे, असे अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ला यवतमाळमधून सुरुवात

यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे मोदीनीं २०१४ साली आपल्या प्रचाराची आणि देशाला दिलेल्या आश्वासनांची सुरुवात केली. त्याच यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकरी पंतप्रधानांचे नाव सुसाईड नोटमध्ये नाव लिहून आत्महत्या करतात ही दुर्देवाची बाबा असल्याचे अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

 

 

 

Related posts

राज्यांचे ब्रँडींग करताना कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Aprna

“मी एनसीबीला आव्हान देतो की त्यांनी…”, – नवाब मलिक

News Desk

मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज!

News Desk