HW News Marathi
देश / विदेश

एअर स्ट्राईकनंतर आता देशातील ५ मोठ्या शहरांना हाय अलर्ट

नवी दिल्ली | पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय वायू दलाकडून करण्यात आलेला कारवाईनंतर आता देशातील ५ मोठ्या शहरांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी दिल्ली तसेच मुंबईसह ५ मोठ्या शहरांना ७२ तासांसाठी हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय वायू दलाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता दहशतवाद्यांकडून प्रत्युत्तराखातर हल्ले घडवून आणले जाऊ शकतात त्यामुळे देशातील अंतर्गत सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्‍तानच्या सीमेलगत असलेल्या राज्यांना म्हणजेच पंजाब, राजस्‍थान, गुजरातमध्ये देखील हाय ॲलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यापर्यंत संध्याकाळी ७ वाजल्यानंतर आंतररांष्‍ट्रीय सीमेपासून ५ किमीच्या परिसरात सर्वसामान्यांना बंदी घालण्यात आली आहे. “पाकिस्‍तानी सैन्याकडून भारताला तितकासा धोका नसला तरी, काश्मीर खोर्‍यात सक्रीय असलेल्‍या आयएसआय संघटनेच्या दहशतवाद्‍यांकडून मात्र कुरघोड्या होण्याची शक्यता दुणावली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील परमाणू प्रतिष्‍ठान, एअरबेस, नौदल, सैन्यांच्या शिबिरांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे”, अशी माहिती गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात करण्यासाठी भारताला वर्ल्ड बॅंकेने दिले आर्थिक सहाय्य

News Desk

निवडणूक लढविण्यासाठीच्या वयोमर्यादेवर निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला !

News Desk

गणेशोत्सवाला धावणार राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’

News Desk