HW News Marathi
देश / विदेश

#AirStrike : दमदार कारवाईनंतर भारतीय सैन्याने ट्विट केली ‘ही’ कविता

नवी दिल्ली | भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे ३.३० च्या सुमारास तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्याकडून अवघ्या २० मिनिटांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील आता या कारवाईला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या ‘बालाकोट’ या दहशतवादी तळातील २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे.

पाकिस्तानकडूनच भारताच्या या एअर स्ट्राईकबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. भारतीय सैन्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देखील पाकिस्तानला इशारा देणारी एक कविता पोस्ट करण्यात आली आहे. हिंदीतील प्रसिद्ध कवी रामधारी सिंह “दिनकर” यांच्या कवितेच्या काही ओली भारतीय सैन्याकडून पोस्ट करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने १४ फेब्रुवारीला भारताच्या सीआरपीएफ जवानांवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ४० जावं शहीद झाले. अखेर या घटनेचा बदल भारतीय सैन्याने घेतला आहे.

“क्षमाशील हो रिपु-समक्ष

तुम हुए विनीत जितना ही,

दुष्ट कौरवों ने तुमको

कायर समझा उतना ही।

सच पूछो, तो शर में ही

बसती है दीप्ति विनय की,

सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंडोनेशियात आता ज्वालामुखीचा उद्रेक

Gauri Tilekar

पेटत्या चितेतून बाहेर काढला महिलेचा मृतदेह

News Desk

भारतात बोईंग ७३७ मॅक्स-८ विमान वापरावर बंदी

News Desk