HW News Marathi
देश / विदेश

जनसामान्यांच्या आस्था व भावनांचा सर्वोच्च न्यायलयाने आदर करावा !

मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) ६४ वे अधिवेशन झाले आहे. या अधिवेशात मांडलेल्या मुद्द्यांवर मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली होती. प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यावेळी म्हणाले कि, राम मंदिर आणि शबरीमाला हा जनसामान्यांच्या आस्था व भावनांचा विषय आहे. सर्वोच्च न्यायलयाने त्याचा आदर करावा. तसेच अभाविपतर्फे महिला सुरक्षा आणि स्वावलंबनासारख्या काही विषयांवर ‘मिशन साहसी’मार्फत पाम प्रिंट अभियान राबविण्यात आले होते. या अधिवेशनात विद्यार्थ्यांकरिता १० समांतर सत्र आयोजित करण्यात आली होती. या सत्रांमध्ये शहरी माओवाद, आंतरराष्ट्रीय परिदृश्य, महिला सुरक्षा, आर्थिक परिदृश्य, डॉ. आंबेडकर इ. विषयांचा समावेश होता.

अभाविपच्या या अधिवेशनात तीन प्रस्ताव आणि दोन संकल्प देखील पारित करण्यात आले. ‘लोक श्रद्धा विषयांवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर व्हावे’, ‘भारताच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गावर येणारी आव्हाने’, आणि ‘पदवी शिक्षण क्षेत्रात सुधार होण्याची गरज’ हे तिन्ही प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारी परिषदेत ‘शिक्षा क्षेत्रात माओवादी प्रसार थांबवणे गरजेचे’ हा प्रस्तावही एकमताने पारित करण्यात आला. त्याचबरोबर दोन संकल्प पण विद्यार्थ्यांसोबत घेण्यात आले ज्यात ‘महिला सन्मान आमचा स्वाभिमान’ आणि ‘उत्तम भविष्याकरिता करा मतदान’ यांचा समावेश आहे.

अहमदाबादच्या साबरमती रिवरफ्रंट येथे २७ ते ३० डिसेंबर या कार्यकाळात आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय महामंत्री आशीष चौहान यांनी आगामी कार्यक्रमाच्या घोषणा स्वरूपात १००% मतदान करण्याकरिता जनजागरण अभियान व मिशन साहसी कार्यक्रम देशभरात करण्याकरिता घोषणा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी  | बाळासाहेब थोरात

News Desk

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

News Desk

#PulwamaAttack : आम्ही केंद्रासोबत, ही राजकारण करण्याची वेळ नाही !

News Desk