HW News Marathi
देश / विदेश

तिहेरी तलाकवर हुसेन दलावाईचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली | पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत तिहेरी तलाकवरून नवा वादंग ‘केवळ मुसलमानच नव्हे तर, हिंदू, ख्रिश्चन, शीख धर्मातही स्त्रियांना असमान वागणूक दिली गेली आहे. आपल्या समाजात कायमच पुरुषांचे वर्चस्व अधिक राहिले आहे. श्री रामचंद्रांनीसुद्धा सीतेवर संशय घेऊन तिला सोडले होते. त्यामुळे आपल्या सर्वांनाच बदल घडवून आणायचा आहे’, असे वादग्रस्त विधान करून काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी स्वतःवर मोठा रोष ओढवून घेतला आहे.

तिहेरी तलाकची पद्धत अवैध ठरवणारे विधेयक डिसेंबर महिन्यात लोकसभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेतही हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात केले होते. तीन तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही. त्यामुळे हे विधेयक हिवाळी आधिवेशनात मांडले जाणार आहे.

‘कोणाच्या ही भावना दुखविण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. आणि मी केलेल्या विधानावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी का मागावी,’ असे हुसेन दलवाई यांनी तीन तलाक संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधाना बदल माफी मागितली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीच्या कुटुंबात खडसेंचं स्वागत, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

CBSE बोर्डाची १०वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार  

News Desk

निर्भया प्रकरणातील आरोपीची फाशीची शिक्षा कायम

News Desk