HW News Marathi
देश / विदेश

मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे !

नवी दिल्ली | “आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मात्र, आम्ही केवळ औपचारिकता म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे. आम्ही बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे हे मूर्खपणाचे ठरेल”, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. उद्या तुमच्यापैकी कोणी विचारला कि तुम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली का ? तर हो भेटलो. मात्र, याबाबतचा पुढील निर्णय महाराष्ट्रात घेणार असल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी सोमवारी (८ जुलै) मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेतली.

मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस का करायची ?

“मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस का करायची ?”, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे. “ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटला हे समजत नाही कि मी कोणाला मत देतो आणि माझे मत कुठे जाते ?. जनतेला ईव्हीएम पद्धतीवर आज नव्हे तर २० वर्षांपासून शंका आहे. ३७० मतदारसंघात ईव्हीएमचा घोळ आहे. जे हरले त्यांना तर शंका आहेच पण जे जिंकले त्यांनाही आपण कसे जिंकलो याबाबत शंका आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान व्हावे. म्हणजे लोकांना नेमके कळेल कि माझे मत मी कोणाला दिले ?”, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

२०१४ नंतर भाजप ईव्हीएमविरोधी बोलायचेच बंद झाले !

“जनतेचा ईव्हीएम पद्धतीवर विश्वास नाही. मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे. मात्र, मी औपचारिकता केली आहे. म्हणून मी आगामी निवडणुकांसाठी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ईव्हीएमची चीप अमेरिकेहून मागविली जाते. तसे असेल तर मग विश्वास कसा ठेवायचा ? ईव्हीएम चिपमध्ये हॅकिंग होऊ शकते. २०१४ साली ईव्हीएमविरोधी भूमिका घेणारे भाजप २०१४ नंतर बोलायचेच बंद झाले”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये तैनात असेलेल्या लष्करातील जवानांना विमान प्रवासाची सुविधा

News Desk

दिल्ली सीमेवर असलेला खिळ्यांचा वेढा हा भारत-चीन सीमेवर हवा होता, राऊतांचा केंद्र सरकारला टोला

News Desk

मोदी मंत्रिमंडळातील नवं खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठलं खातं?

News Desk