HW News Marathi
देश / विदेश

मी राजकारणाचा बळी | नीरव मोदी

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 12 हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदीने मी राजकारणाचा बळी ठरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय देण्याची मागणी मोदीने केली असल्याची माहिती फायनान्शियल टाईम्स यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांना यांनी दिली आहे.

नीरव मोदीला पकडण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही न्यायसंस्थेच्या निर्देशांची वाट पाहत असल्याचे सांगितले. बँकांची फसवणूक करुन परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि विजय मल्ल्या या दोघांना परत भारतात आणण्याचा दबाव सरकारवर आहे.

मोदी जेव्हा भारतातून परळून गेल्यानंतर भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला असून तपास यंत्रणेने लूक आऊट नोटीस जारी केले होती. यानंतर पोलिसांनी 25 जाणांविरोधात गुन्हे दाखल केले असून नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्या, मेहुल चोकसी आणि दोन बँक संचालक यांचा देखील यात समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

त्रालमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या जवानांनी २-३ दहशतवाद्यांना घेरले

News Desk

सरकारचे प्रेम फक्त मुस्लीम महिलांवर, शबरीमलाचा निर्णय मात्र हिंदू महिलांविरोधात !

News Desk

रशियामध्ये महाभूकंप, कामचटका परिसरात 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

News Desk
देश / विदेश

ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार, भारत-अमेरिका संबंध धोक्यात ?

News Desk

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनाला भारतात येण्यास नकार दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या प्रजासत्ताक दिनादिवशी प्रमुख अतिथी म्हणून हजर राहणार होते. परंतु आता अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पत्र लिहून ट्रम्प भारतात येणार नसल्याचे कळविले आहे. भारताने रशियाकडून एक-४०० मिसाईल खरेदी केल्यामुळे तसेच इराणकडून तेलाची आयात केल्याने डोनाल्ड ट्रम्प नाराज झाल्याचे म्हटले जात आहे.

भारताने रशियाकडून एस-४०० मिसाईल खरेदी करण्यास अमेरिकेचा संपूर्ण विरोध होता. तसेच भारताने अमेरिकेची एफ-१६ विमाने खरेदी करावीत असे अमेरिकेकडून भारताला सांगण्यात आले होते. परंतु, अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता भारताने नुकतीच रशियाकडून एस-४०० मिसाईल खरेदी केली आहेत. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेतील काही राजकीय कार्यक्रमांचे कारण देत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात येणे टाळले असून त्याबद्दल त्यांनी खेद देखील व्यक्त केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात येण्यास दिलेल्या नकाराचा सर्वाधिक फटका पंतप्रधान मोदींना बसणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यामुळे भारत-अमेरिकेचे संबंध चिघळण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही.

Related posts

‘मंगळयाना’नंतर आता इस्रोची ‘शुक्रा’वर जाण्याची तयारी

News Desk

देशाची निर्यात वृद्धी होण्यासाठी लॉजिस्टीक खर्च कमी करण्याची आवश्यकता – नितीन गडकरी

News Desk

HW Exclusive :… म्हणून चीन भारतासोबत युद्धाचे धाडस करणार नाही !

News Desk