HW News Marathi
देश / विदेश

मी राजकारणाचा बळी | नीरव मोदी

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 12 हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदीने मी राजकारणाचा बळी ठरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय देण्याची मागणी मोदीने केली असल्याची माहिती फायनान्शियल टाईम्स यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांना यांनी दिली आहे.

नीरव मोदीला पकडण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही न्यायसंस्थेच्या निर्देशांची वाट पाहत असल्याचे सांगितले. बँकांची फसवणूक करुन परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि विजय मल्ल्या या दोघांना परत भारतात आणण्याचा दबाव सरकारवर आहे.

मोदी जेव्हा भारतातून परळून गेल्यानंतर भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला असून तपास यंत्रणेने लूक आऊट नोटीस जारी केले होती. यानंतर पोलिसांनी 25 जाणांविरोधात गुन्हे दाखल केले असून नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्या, मेहुल चोकसी आणि दोन बँक संचालक यांचा देखील यात समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यात हस्तक्षेप करू नये !

News Desk

काश्मिरात ‘लष्कर’च्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान

News Desk

“वेळ पडली तर बेळगावात विरोधीपक्षाच्या नेतृत्वात आंदोलन करु, पण ते येतील का ?” 

News Desk