HW News Marathi
देश / विदेश

५ एप्रिलला रात्री ९ वाजता लाईट बंद करून दिवे लावा !

नवी दिल्ली | कोरोनाबाधितांच्या आयुष्यातील अंधार दुरु करण्यासाठी येत्या रविवारी (५ एप्रिल) रात्री ९ वाजता ९ मिनिटाचा वेळ द्या, असे आवाहन नरेंद्र मोदी आज (३ एप्रिल) केले आहे. यावेळी मोदी म्हणाले की, घरातील प्रत्येक व्यक्तीने एक दिवा लावा. यात देशातील नागरिकांनी त्यांच्या घर आणि बाल्कनीत येऊन मोबाईलची फ्लॅश, मेणबत्ती, मोबाईलची फ्लॅश लाइट आणि दिवे लावावा. दरम्यान, या प्रसंगी नागरिकांनी घराबाहेर येऊन रस्त्यावर, गल्लीत एकत्र जमायचे नाही, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत दिवे लावावे, अशी विनंतीही मोदींनी देशवासियांना केली.

देशात संबोधित करताना मोदी म्हणाले, देशवासियांन २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूच्या निमित्ताने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रती केलेल्या अभिवादनचे अनेक देश अनुकरण करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आपण जगासमोर सामूहिक शक्तींचे आपण जगाला दर्शन घडवीले आहे. कोरोनाविरुद्धातील ही लढाई एकटा कसा लढू असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. किती काळ ही परिस्थिती राहणार हे असे प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पण, आपण घरात असलो तरी एकटे नाही, सामूहिक शक्तीने आपण कोरोनाचा मुकाबला करत आहोत.

कोरोनाच्या अंधकारातून निरंतर प्रकाशाकडे जायचे आहे. कोरोना संकटामुळे गरीब जास्त प्रभावित झाले आहेत. या संकटातून त्यांना नवीन ऊर्जा मिळवून द्यायची आहे, असे मोदींनी सांगितले. या कोरोनाच्या संकटाविरुद्धच्या लढाईला प्रकाशित करून तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचे आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटे हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बाल्कनीत उभे राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे मालवून गॅलरीत उभे राहून मेणबत्ती, दिवे मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा- मोदी
  • येत्या ५ एप्रिलला १३० कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे
  • कोरोनाला दुर करायचे असल्यास लक्ष्मण रेषेचे पालक करा.
  • गरीबांच्या आणि कोरोनाबाधितांच्या आयुष्यातील अंधार दुरु करुयात.
  • कोरोनाला हरवू या, भारताला जिंकवूया.
  • आपण घरात असलो तरी एकटे नाही आहोत
  • भारताने दाखविलेल्या धैर्याचे अनेक देशांसाठी आदर्श
  • कोरोनाशी सरकार आणि लोकांचा सामूहिक लढा, सामूहिक लढ्यातून विराट आणि शक्तींचे प्रदर्शन
  • २२ मार्च जनता कर्फ्यू मार्फ कोरोनाशी लढणाऱ्यांना केलेल्या अभिवन केले
  • लॉकाडऊन काळातच्या काळात देशातील नागरिकांचे चांगले सहकार्य
  • देशातील लॉकडाऊनला ९ दिवस झाला आहे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परीक्षेशी आरोग्य विभागाचा संबंध नाही, मात्र तरीही….

News Desk

स्टॅलिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

News Desk

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी घेतला अखेरचा श्वास

News Desk