HW News Marathi
देश / विदेश

सलमानला तुरुंगावास झाला तर जोधपूर तुरुंगात आसाराम बापू शेजारी

जोधपूर | काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवले आहे. तर सैफ आली खान, नीलम, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांना कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सलमानला वन्यजीव संरक्षण काद्यांर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. सलमानला किती वर्षाची शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सलमानला जर तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली आणि जामीनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास नाईलाजाने तुरुंगात जावेच लागेल. तर पुन्हा एकदा जोधपूर सेंट्रल जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात येईल. याआधी सुद्धा सलमानला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे सलमानला शिक्षा झाली जेलमध्ये आसाराम बापू सध्या याच तुरुंगात मुलींच्या लैंकिग शोषण प्रकरणी शिक्षा भोगत आहे. सलमानला जर तुरुंगात गेल्यानंतर आसाराम बापू यांच्या बाजूच्या बरॅकमध्ये ठेवण्याची शक्यता आहे.

सलमानला जेव्हा जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा बरॅक नंबर १ मध्ये ठेवले होते. तेव्हा सलमानची ओळख कैदी नंबर ३४३ अशी होती. जोधपूर न्यायालयात सलमानच्या शिक्षेच्या सुनावणीचा युक्तीवाद सध्या सुरु असून काही वेळातच शिक्षा सुनावली जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाणावर होणार सुनावणी

Aprna

हवामान बदलामुळे पहिल्याच दिवशी अमरनाथ यात्रेला ब्रेक

News Desk

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर!

News Desk