HW News Marathi
देश / विदेश

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळा, पंतप्रधानांचे भारतीयांना आवाहन

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. सुरुवातीलाच कोरोनाच्या या संकटामूळे मला काही कठीण निर्णय घ्यावे लागत आहेत त्याबद्दल मी देशवासीयांची माफी मागतो. मात्र, सध्याच्या काळात असे निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. देशात केलेला लॉकडाऊन हा लोकांच्या हितासाठी आहे. परंतु, काही जण या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. कोरोनाबाबत अजूनही काही लोक गंभीर नाही आहेत. अशांनी लॉकडाऊनची लक्ष्मण रेषा पाळणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर सांगत असलेल्या सुचनांचे पालन करा. योग्य पथ्य आणि उपचाराने कोरोनावर मात करता येते, असेही मोदींनी सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी कोरोनावर मात करुन बरे झालेल्या लोकांशी संवाद साधला. प्रथम त्यांनी रामगंम्पा तेजा यांच्याशी बातचीत केली. आयटी क्षेत्रातील राम यांना कोरोनाची बाधा झाली. पण त्यानी घाबरुन न जाता डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व बाबींचे पालन केले. १४ दिवस उपचार केल्यानंतर ठणठणीत बरे होऊन ते घरी गेले. परंतू, घरी आल्यावरही त्यांना काही काळ डॉक्टरांनी होम क्वॉरंटाईनचा सल्ला दिला आहे तो ते काटेकोरपणे पाळत आहेत. दरम्यान, मोदींनी त्यांना क्वॉरंटाईन बाबत लोकांमध्ये असलेला गैरसमज दुरु करण्यासाठी राम यांना काही व्हिडिओ बनवण्यास सांगितले आहे आणि त्यांना सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी आग्राच्या अशोक कपूर यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कुटुंबातील एकूण ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण कुटुंबाने डॉक्टरांच्या सर्व नियमांचे पालन केले आणि हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

रुग्णांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधानांनी डॉ. नितेश गुप्ता यांच्याशी संवाद साधला. नितेश यांनी पंतप्रधानांचे सर्व प्रथम आभार मानले. त्यांना हव्या त्या सर्व सोयी सुविधा या सरकार करत असल्याने कामं सुरळीत सुरु असल्याचे सांगितले. रुग्णांचे मनोबल वाढवणे महत्त्वाचे आहे. कारण, बाहेरील देशातील परिस्थिती पाहता लोकांचा आत्मविश्वास डगमगतो त्यामूळे जसा सर्दी, खोकला ४-५ दिवसांत बरा होतो तसाच हा ही आजार होतो हे वारंवार रुग्णांना सांगावे लागते असे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोनावर मात करुन घरी गेलेल्या रुग्णांशी आणि डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर कोरोनापासून बचाव करायचा असल्यास लॉकडाऊनची लक्ष्मण रेषा पाळणे आवश्यक आहे. तसेच, या काळातनमी तुम्हाला घरातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे पण या क्षणी तुम्ही स्वत:ला जाणून घेऊ शकता. या लॉकडाऊनच्या काळात मी दिवसभर काय करतो हे नरेंद्र मोदी अॅपवर काही व्हिडिओ मी पोस्ट करेन, कदाचित तुम्हाला त्याचा उपयोग होईल. त्याचसोबत मी सांगू इच्छितो मी योगा ट्रेनर नाही आहे मी देखील योगा शिकत आहे. तसेच, मानवतेला सर्वोच्च स्थानावर ठेवणाऱ्या नर्सेसना मी नमन करतो. तुम्ही ज्या सेवाभावाने कार्य करता ते केवळ अतुलनीय आहे. २०२० हे वर्ष ‘इंटरनॅशनल इअर ऑफ दि नर्सेस ऍन्ड मिडवाइफ’ म्हणून साजरे केले जात आहे हा केवळ संयोग आहे.

संबोधनाच्या शेवटी त्यांनी म्हटले, मित्रांनो, कोरोनाच्या या संकटापासून देशाला वाचवण्यासाठी अनेक सहकारी प्रयत्न करत आहेत. त्यांना साथ द्या. सगळ्यांच्या एकत्रित येण्याने आपण ही लढाई जिंकू शकतो आणि आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे, असे पंतप्रधानांनी भारतीय जनतेला मन की बात या कार्यक्रमातून आवाहन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत दोन दहशतवादी घुसल्याच्या पार्श्वभुमीवर हाय अलर्ट

swarit

आज नीरव मोदीच्या जामीनप्रकरणी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी

News Desk

जाणून घ्या काय आहे कलम ४९७

News Desk