HW News Marathi
देश / विदेश

अधिकवेळा एटीएममधून पैसे काढल्यास दंड भरावा लागणार

मुंबई | एटीएम मध्ये मुबलक पैसे उपलब्ध होतात की नाही तो पर्यंतच सर्वसामान्यांना आणखी एका धक्याला सामोरे जावे लागणार आहे. जास्तीत जास्त ५ वेळा एटीएम मधून नागरीकांना पैसे काढता येणार आहेत. ५ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास प्रत्येक वेळी २० रुपये धील खडखडाट बंद होतो की नाही, तोपर्यंतच आणखी एक झटका बसणार आहे. 5 पेक्षा जास्तवेळा एटीएममधून पैसे काढल्यास, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 20 रुपये दंड आकारला जाणार आहे.

एटीएम ऑपरेटर्सनी ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवण्याची मागणी केल्यामुळे हा दंड आकारला जाणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या देशात 19 कंपन्यांकडे एटीएम कॅश मॅनेजमेंटचे काम आहे. या कंपन्यांना हा सर्व भार सोसावा लागतो असल्याने त्या कंपन्या बँकांकडून तो वसुल करतात. तर बँका तो चार्ज ग्राहकांवर लादणार आहेत.

एटीएम संदर्भातील हे नियम जुलै महिन्यापासून लागू करण्यात यावेत असे आरबीआयने बॅंकांना बजावले आहे. कॅशव्हॅनसाठी आरबीआयने केलेल्या नियमानुसार, कॅश मॅनेजमेंट कंपन्यांकडे कमीत कमी 300 कॅश व्हॅन, प्रत्येक कॅश व्हॅनमध्ये एक ड्रायव्हर, दोन बंदुकधारी आणि दोन कर्मचारी असणे बंधनकारक रहाणार आहे. एटीएम संदर्भातील हा सर्व खर्च बँकांना न परवडणारा असल्यामुळे एटीएम ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवण्याचा निर्णय बॅंकांनी घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा चित्ररथ सादर होणार

News Desk

ओडिशात ‘तितली’ चक्रीवादळामुळे ५७ जणांचा मृत्यू

swarit

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिला राजीनामा!

News Desk