HW News Marathi
देश / विदेश

भारतीय दुतावासातील इफ्तार पार्टीतील पाहुण्यांना पाकिस्तानने धमकावले

इस्लामाबाद | पुलवामा हल्ल्यापासून भारत-पाक संबंधामध्ये तणाव निर्माण झाले. आता यात पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक कृत्य केले आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये काल (१ जून) भारतीय दुतावासात आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत पाकिस्तानी प्रशासनाने पाहुण्यांशी गैरवर्तन केले. सेरेना हॉटेलमध्ये आयोजित इफ्तार पार्टीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचा रस्ता पाक अधिकाऱ्यांनी रोखला. तसेच इफ्तार पार्टीसाठी आलेल्या शेकडो पाहुण्यांशी गैरवर्तन करत त्यांना परत पाठवले.

इफ्तार पार्टीसाठी निमंत्रितांना गुप्त नंबरवरून फोन करण्यात आला. तसेच भारताने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. या प्रकरणावर बोलताना भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी नाराजी व्यक्त केली. “पाक संस्थांकडून परत पाठवण्यात आलेल्या सर्व निमंत्रित पाहुण्यांची आम्ही माफी मागतो. पाकिस्तानी संस्थांचे हे कृत्य निराशाजनक आहे. पाक अधिकाऱ्यांनी केवळ कूटनीतीक प्रोटोकॉलचे उल्लंघनच केले नाही तर गैरवर्तनही केले आहे. याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल,” असेही बिसारिया म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या शपथविधीसाठी यावेळी बिम्सटेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना बोलावण्यात आले होते. परंतु, पाकिस्तानला निमंत्रण दिले नव्हते. तर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींना फोन करून शुभेच्छा दिल्यानंतरही दक्षिण आशियात दहशतवाद मुक्त वातावरण असावे, असा सल्ला दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजीव गांधींचा ‘भारतरत्न’ परत घ्या!

News Desk

कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही

swarit

‘सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही माझ्या डोळ्यांसारखे आहेत!’ व्यंकय्या नायडू दोषी खासदारांवर कारवाई करणार

News Desk