HW News Marathi
देश / विदेश

“तर मी आत्महत्या करेन…” राकेश टिकैत यांचा केंद्राला इशारा

नवी दिल्ली | दिल्लीत २ महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. अशात आता राकेश टिकैत यांनी मोठं विधान केलं आहे. जर जाचक कृषी कायदे सरकारने मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन,” असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. देशातील शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते भावूक झाले होते.

राकेश टिकैत यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलनस्थळावरुन शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “मी आत्मसमर्पण करणार नाही. भाजपा याद्वारे काही वेगळंच दाखवू पाहत आहे. लाल किल्ल्यावरील हिंसाचारासाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड समोर आले पाहिजेत. दीप सिंधूबाबत लोकांना माहिती व्हायला हवी. याप्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून चौकशी व्हायला हवी”

“सरकारने आमची लाईट-पाण्याची सुविधा तोडली आहे. जर गरज पडली तर गावांमधून आणखी लोक येतील. आम्ही गावांतून पाण्याचे टँकर मागवू. जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत,” असंही टिकैत यावेळी म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात मेल, एक्स्प्रेस, लोकल सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंदच

News Desk

कर्जमाफीच्या बदल्यात ‘सेक्स’

News Desk

ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

News Desk