HW News Marathi
देश / विदेश

तामिळनाडूत ‘गाजा’ चक्रीवादळाचा धोका, ७६ हजार लोकांचे स्थलांतर

चेन्नई | तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात ‘तितली’ चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे ‘गाजा’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकले होते. कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ गुरुवारी (१५ नोव्हेंबर)ला धडकले आहेत.

किनारपट्टी भागातील ७६ हजार २९० लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती तामिळनाडू सरकारच्या वतीने देण्यात आली. प्रशासनाने घेतलेल्या चोख खबरदारीमुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नागपट्टनमा येथे प्रचंड पाऊस आणि तुफान सुरुच आहे. भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. या चक्रीवादळात गेल्या दोन तासात अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत.

येत्या २४ तासात या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेषतः हे वादळ तामिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी येथील कराईकल येथील किनारपट्टीवर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

News Desk

मद्रास न्यायालयाने ‘टिकटॉक अ‍ॅप’वरील बंदी उठवली

News Desk

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, तिघांचा मृत्यू

News Desk