HW News Marathi
देश / विदेश

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम सरकारचे आहे – शरद पवार

नवी दिल्ली | केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्याविरोधात गेले अनेक दिवस शेतकऱ्यांचे आंदलन सुरु आहे. दरम्यान, केंद्राने हे कायदे मागे घ्यावे यासाठी मागणी करण्यात आली. याच मागणीसाठी आज (९ डिसेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी देखील उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रपतींच्या भेटीनंतर शरद पवार आणि राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

यावेळी पत्रकार परिषेदत बोलताना शरद पवार असं म्हणाले की, सरकारने हे कृषी कायदे रद्द करावे अशी सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. थंडीत शेतकरी अनेक दिवस आंदोलन करत उभा आहे त्यांची मागणी पुर्ण करणे आणि समस्या सोडवण्याचे सरकारचे काम आहे. तसेच, घाईघाईत कृषी कायद्याचा निर्णय घेतल्याचेही पवार म्हणाले आहेत. यावेळी युपीएच्या शिष्टमंडळानेही राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. शेतकरी आंदोलन चिघळणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे. कारण शेतकऱ्यांनी आज मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला आहे.

एवढंच नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.१२ डिसेंबरला राजस्थान हायवे आणि दिल्ली बॉर्डर जाम करणार. १४ डिसेंबरला एक दिवसाचं उपोषण केलं जाणार आहे असं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच त्याच दिवशी धरणे आंदोलनही संपूर्ण देशभरात केलं जाणार आहे. जोपर्यंत मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार आहे असंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फॉक्सवॅगनमुळे देशाच्या पर्यावरणाचे नुकसान, ठोठावला ५०० कोटींचा दंड

News Desk

आरोग्यमंत्री झोपले आहेत का? – संभाजी ब्रिगेड

News Desk

हिंदी साहित्यातील प्रसिद्ध लेखक नामवर सिंह यांचे निधन

News Desk