HW News Marathi
देश / विदेश

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक

सीडनी | कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला कांस्य पदक मिळाले आहे. पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमध्ये १८ वर्षीय दीपक लाथरने ६९ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. दीपकने स्नॅचमध्ये १३५ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १५९ किलो असे मिळून २९५ किलो वजन उचलल्यानंतर कांस्य पदकास गवसणी घातली.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे हे चौथे पदक आहे. पहिल्या दिवशी मीराबाई चानूने सुवर्ण पदक, गुरु राजाने रौप्य पदक, संजिता चानू सुवर्ण पदक आणि दीपक लाथरने कांस्य पदक या चारही जणांनी पदक मिळवून कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची मान उंचावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कुलभूषण जाधवांना सोडवा, हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल!

News Desk

मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबादारीतून मुक्त करा – सोनिया गांधी

News Desk

दिलासादायक ! देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात ४० टक्क्यांनी घट

News Desk
मुंबई

भाजप ही सिंहाची पार्टी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

मुंबई | “२०१४मध्ये मोदींनी ज्यांची दुकानदारी बंदी केली, असे बेरोजगार आता एकत्र येऊन मोदी विरोधात एकत्र लढणार आहेत. हेच लोक एकमेकांना विरोधात लढणारे लोक आहेत. पण, शिकार दिसली की, जसे लांडगे शिकारीसाठी एकत्र येतात. तसे हे सर्व लांडगे सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र येत आहे. पण, ही सिंहाची पार्टी आहे. कितीही लांडगे एकत्र आले तरी सिंहाशी हे लांडगे लढू शकणार नाही.” विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी टीकेची झोड उठवली.

‘येत्या काळात सत्तेसाठी दंगली देखील होतील. समाजात जातीय तेढ निर्माण करतील. संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षण हे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. पवार साहेब तुमची नेमकी भूमिका काय आहे,’ असा उलटा सवाल फडणवीस यांनी शरद पवार यांना विचारला आहे. ‘हे किती ही लांडगे एकत्रित आले, तरी २०१९ लाल किल्ल्यावर भाजपचा झेंडा फडकल्या शिवाय राहणार नाही,’ असे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी यावेळी बोलत होते.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी विरोधकांवर टीका केली.

Related posts

गोड्या पाण्यातील मच्छिमारांचे धरणे आंदोलन

News Desk

जोरदार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

News Desk

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna